पालघर जिल्ह्यामध्ये गेल्या ५ दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु असून धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यामुळे सूर्या नदीवरील धामणी धरण ९५ टक्के भरले आहे. या धरणाचे पाचही दरवाजे ३ फुटापर्यंत उघडण्यात आले असून १६,००० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

या विसर्गामुळे धामणी धरणाच्या खालच्या बाजूला असणारा कवडास उन्नती बंधारा ओव्हरफ्लो झाला असून त्यातून ४२,००० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

Dam stock at 23 per cent four new dams nearing completion
धरणसाठा २३ टक्क्यांवर, नव्याने चार धरणे तळ गाठण्याच्या स्थितीत; सहा धरणांत २० टक्क्यांहून कमी पाणी
Relief for flood affected Chirner due to works started before monsoon
पावसाळ्यापूर्वी सुरू झालेल्या कामांमुळे पूरग्रस्त चिरनेरला दिलासा?
Two more days of hailstrome in Vidarbha Pune news
विदर्भात आणखी दोन दिवस गारपीट; जाणून घ्या, कोणत्या जिल्ह्याना दिला इशारा
water scarcity, Pimpri chinchwad , shortage of water supply, Andhra Dam
पिंपरी : आंद्रा धरणातून मिळणाऱ्या पाण्यात घट…उपनगरांमध्ये पाणीटंचाई

आठवडाभर सातत्याने जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु असल्याने सुर्या नदी दुथडी भरून वाहत असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच या कालावधीत नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहनही धरण प्रशासनाकडून करण्यात आले आहे.