२९ जूनला पंढरपूरला आषाढी वारी पार पडणार आहे. त्यासाठी पंढरपूरच्या दिशने पालख्याही निघाल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या अडचणींना सामोरे जायला लागू नये, म्हणून चोख नियोजन करण्याचे आदेश गुरूवारी ( १ जून ) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. वारीसाठी येणाऱ्या वाहनांना परतीच्या प्रवासासह टोलमाफी देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.
पंढरपूरच्या वारीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
वारीत सहभागी होणाऱ्या वाहनांना टोला द्यावा लागू नये, यासाठी पोलीस विभागाने स्टीकर किंवा पासच्या माध्यमातून कार्यवाही करावी. टोल नाक्यांवर विशेष व्यवस्था करून, वारकऱ्यांना टोल द्यावा लागू नये, असं नियोजन करावे. पालखी मार्गावरील टोल नाके सुरु होणार नाहीत. त्याबाबत केंद्रीय मंत्री नितीश गडकरी यांच्याशी संपर्क साधून त्यांना कल्पना दिल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.
वारी मार्गावर ठिकठिकाणी वारकऱ्यांसाठी चांगल्या पद्धतीने तंबू-निवारे उभे राहतील, पंखे आणि सावली यासाठी काळजी घ्यावी. वैद्यकीय पथके, तज्ज्ञ आणि रुग्णवाहिकांची सज्जता ठेवावी. औषधे पिण्याचा पाणी, अन्न आरोग्यसुविधा याबाबत वेळीच नियोजन करावे, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना केल्या आहेत.
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pandharpur ashadhi ekadas toll free for varkari say cm eknath shinde ssa