बल्लारपूर तालुक्यातील मानोरा येथील पॅराकमांडो निखील श्रावण बुरांडे (२५) यांने आज गुरुवारी आग्रा येथे राहत्या खोलीत गळफास घेत आत्महत्या केली.

निखिल तीन वर्षांपूर्वी सैन्यात दाखल झाला होता, तो आग्रा येथे कार्यरत होता व आग्रा सैन्य कॅन्टोन्मेंट परिवारात निखिल राहत होता. निखिलने कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली याच कारण सध्या अस्पष्ट आहे.

निखिलचा मृतदेह दिल्लीवरून आज (गुरूवार) रात्री नागपूरला आणला जाणार असून, इथून तो बल्लारपूर तालुक्यातील मानोरा या त्याच्या गावी आणला जाणार आहे. उद्या (शुक्रवार) निखिलवर अंत्यसंस्कार होणार आहेत.