वर्धा : समृद्धी महामार्गाचे बांधकाम करताना थेट कालव्यातच खांब उभारण्याचा प्रकार घडला असून शेतकऱ्यांची सिंचन व्यवस्था बाधित झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वर्धेलगत येळाकेळी परिसरात दहेगाव आष्टा भागात कालव्याच्या मधोमध समृद्धीवरील पुलाचे तीन खांब उभे करण्यात आले आहते. कालव्याच्या मधोमध खांब उभे करण्याची परवानगी कशी देण्यात आली, असा सवाल आमदार डॉ. पंकज भोयर यांनी रस्ते विकास महामंडळ व पाटबंधारे विभागाला केला आहे. चक्क कालव्यातच खांब उभारल्याने तसेच पूल तोडून पाइप टाकल्याने पाण्याचा प्रवाह अडला आहे. शेतात पाणी पोहोचण्याचा मार्गच त्यामुळे ठप्प झाला आहे. या संदर्भात अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्यावर आमदार डॉ. भोयर यांनी कालवा परिसराची पाहणी केली. सेलू पाठबंधारे उपविभागात येणाऱ्या आष्टा कालव्याला समांतर महामार्गाचा एक किलोमीटर लांबीचा पट्टा आहे. रस्ता बांधण्यापूर्वी शेतकऱ्यांना ये-जा करण्यासाठी कालव्यावर पूल बांधण्यात आला होता.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pillars directly in the canal during construction of samrudhi highway zws
First published on: 30-11-2021 at 02:06 IST