scorecardresearch

Premium

“दिवाळीनंतर देशात कत्तल की रात…”, प्रकाश आंबेडकर यांचं मोठं वक्तव्य

प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केलं आहे की, वंचित बहुजन आघाडी आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व ४८ जागा लढवणार आहे.

Prakash Ambedkar
प्रकाश आंबेडकर म्हणाले, देशात दिवाळीनंतर कत्तल की रात होईल.

वंचित बहुजन आघाडी आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या सर्व ४८ जागा लढवणार आहे. पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी नुकतीच याबाबतची घोषणा केली आहे. दरम्यान, वंचितने निवडणुकीच्या प्रचाराला आत्तापासूनच सुरुवात केली आहे. तसेच राज्यभरात पक्षाची मोर्चेबांधणी केली जात आहे. वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्रात शिवसेनेच्या ठाकरे गटाबरोबर युती केली आहे. अद्याप या दोन्ही पक्षांमध्ये किंवा महाविकास आघाडीतही (ठाकरे गट महाविकास आघाडीचा भाग आहे) जागावाटपाबाबत चर्चा झालेली नाही. दरम्यान, आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राज्यात अराजकता वाढेल असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, मी याअगोदरही म्हटलं आहे की इथे दिवाळीनंतर कत्तल की रात (कत्तलींची रात्र) होईल. सगळीकडे पूर्णपणे अराजकता माजलेली असेल. या देशात निवडणुकीच्या अगोदर जी परिस्थिती याआधी कधीच झाली नाही, तशी परिस्थिती होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व भारतीयांना माझा आग्रह आहे की, कितीही स्फोटक परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न झाला तरी मतदान होईपर्यंत सर्वांनी शांतता राखा. मी आधीच सर्वांना शांततेचं आवाहन करतोय. राज्यात आरक्षणाची मागणी करणारी आंदोलनं स्फोटक होत आहेत. त्यामुळे ‘कब है दिवाली?’ असं म्हणायची वेळ आली आहे.

prakash ambedkar, narayan rane
“त्या चिंधीचोराने माझ्याशी…”, प्रकाश आंबेडकरांचा नारायण राणेंना टोला
elgar parishad to reduce tension between maratha and obc community prakash ambedkar claim before commission
वंचित बहुजन आघाडी लोकसभेच्या सर्व जागा लढवणार, प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा
Eknath SHinde (
Maharashtra News : आमदार अपात्रतेप्रकरणी आजच्या सुनावणीत काय घडलं? शिंदे गटाचे प्रवक्ते म्हणाले, “विधानसभा अध्यक्षांनी निकाल…”
Mahadev Jankar
“इंडिया आघाडीकडं महाराष्ट्रातील लोकसभेच्या पाच जागांची मागणी केली, पण…”, जानकरांचं मोठं विधान

दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केलं आहे की, वंचित बहुजन आघाडी आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व ४८ जागा लढवणार असून पक्षाने तशी तयारी सुरू केली आहे. त्याचबरोबर स्वतः प्रकाश आंबेडकर हे अकोल्यातून लोकसभा निवडणूक लढणार आहेत.

हे ही वाचा >> अजित पवार गणपती दर्शनासाठी फडणवीसांच्या घरी गेले पण मुख्यमंत्र्यांकडे का गेले नाहीत? दीपक केसरकर म्हणाले…

वंचितचा इंडिया आघाडीत समावेश होणार का?

वंचित बहुजन आघाडीचा इंडिया आघाडीत समावेश व्हावा यासाठी प्रकाश आंबेडकर प्रयत्न करत आहेत. दरम्यान, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना इंडिया आघाडीत सहभागी होण्याबाबत पत्र देऊनही त्यावर अद्याप उत्तर आलेलं नाही. लोकसभा निवडणुका कधीही होण्याची शक्यता असल्याचे गृहीत धरून वंचित बहुजन आघाडी राज्यातील सर्वच्या सर्व ४८ जागा लढवणार असल्याची घोषणा वचितचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत केली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Prakash ambedkar big remark on loksabha election will be huge chaos in country asc

First published on: 29-09-2023 at 17:24 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×