सध्या देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे सुरू आहे. पंडित जवाहरलाल नेहरुंनी शांतीसाठी कबुतरं सोडली होती. पण, नेहरूंनी त्यांच्या वाढदिवशी कबुतरं नाही सोडली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वत:चा वाढदिवस बघून चित्ता आणला. त्यातून सगळ्यांना चित्ता सोडण्याची भीती दाखवली. आत्तापर्यंत ईडी, सीबीआय, आयकर विभाग होता. आता चित्ता आहे, असा खोचक टोला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान मोदी यांनी लगावला आहे. ते सांगलीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवरही प्रकाश आंबेडकर यांनी आपलं मतं व्यक्त केलं आहे. “भाजपा आणि आरएसएस विरुद्ध लढण्यासाठी काँग्रेसला नवीन शस्त्र उभारावी लागतील. नवीन विषय मांडावे लागतील. सध्या समाजात दुही वाढत असून, तो चिंतेचा विषय आहे. ही दुही कमी करण्यासाठी राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा असेल तर, त्याची चंद्रशेखर यांच्या यात्रेशी बरोबरी झाली असती,” असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

Narendra Modi death threat
“जगभरात मोदींच्या हत्येचा कट”, भाजपाच्या नेत्याचं खळबळजनक विधान; म्हणाले, “मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर…”
Tushar gandhi on Prakash Ambedkar vba voting
पुन्हा आंबेडकर विरुद्ध गांधी वाद; ‘वंचितला मतदान करू नका’, महात्मा गांधींच्या पणतूची प्रकाश आंबेडकरांवर टीका
Prakash Ambedkar, Criticizes, Lack of Unity, Maha vikas Aghadi, vanchit bahujan aghadi, Support, Congress, Seven Seats, lok sabha 2024, election, maharashtra politics, marathi news,
“महाविकास आघाडीत एकोपा नाही,” ॲड. प्रकाश आंबेडकर यांची टीका; म्हणाले, “काँग्रेसला सात जागांवर पाठिंबा…”
Former MLA Dilip Kumar Sananda sent letter to Mallikarjun Kharge demanding support for Adv Prakash Ambedkar in Akola
ॲड. प्रकाश आंबेडकर यांना काँग्रेस पाठिंबा देणार? माजी आमदार म्हणतात, “धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन टाळण्यासाठी…”

“काँग्रेस, शिवसेनेकडून अद्याप…”

“वंचित बहुजन आघाडीवर नेहमी आरोप केला जातो, आम्ही कोणासोबत युती करत नाही. लोकसभा, विधानसभेप्रमाणे काँग्रेस आणि शिवसेनेला जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिकेच्या निवडणुकीत आम्ही युती करण्यास इच्छुक आहोत, असे कळवलं आहे. मात्र, अद्यापही त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही,” असेही प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं.