राष्ट्रीय भावना आणि अन्यायाविरोधात संघर्ष करण्याचे साहस महाराष्ट्राच्या नसानसांत भिनलेले आहे. १९ व्या शतकात महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि महादेव गोविंद रानडे यांनी ज्या समाजसुधारणेला सुरुवात केली. त्याला बाळ गंगाधर टिळक, गोपाळ कृष्ण गोखले आणि बाबासाहेब आंबेडकर यांनी पुढे नेले. महात्मा गांधींनी स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व महाराष्ट्रातील सेवाग्राम आश्रमातूनच केले, असे गौरवोद्गार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी किल्ले रायगडावर काढले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राष्ट्रपती कोविंद यांनी सोमवारी सपत्निक किल्ले रायगडाला भेट दिली आणि छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, पालकमंत्री आदिती तटकरे, रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार संभाजी राजे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा योगिता पारधी यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि अधिकारी उपस्थित होते.  

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: President ramnath kovind at fort raigad abn
First published on: 07-12-2021 at 01:08 IST