कराड : भाजपच्या नेत्यांकडून मराठा विरुद्ध इतर मागासवर्गीय (ओबीसी), आदिवासी विरुद्ध धनगर, हिंदू दलित विरुद्ध बुद्धिस्ट दलित असे विभाजन करण्याचा प्रयत्न झाला. हे राज्याच्या भविष्याकरिता धोकादायक असून, महाराष्ट्रात असे कधीही घडले नव्हते, अशी खंत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली. महाविकास आघाडीने जाती-पातीचे राजकारण बिलकुल केले नसल्याचा निर्वाळा त्यांनी दिला.

कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात ‘मविआ’तर्फे काँग्रेसचे उमेदवार म्हणून पराभव झाल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कराड दक्षिणच्या मतदारांनी दिलेला कौल मान्य असल्याचे स्पष्ट करीत विजयी झालेल्या भाजप उमेदवार डॉ. अतुल भोसले तसेच राज्यातील नवनिर्वाचित विधानसभा सदस्यांचे पृथ्वीराज चव्हाण यांनी अभिनंदन केले. ‘कराड दक्षिण’मध्ये विजयी झालेल्या प्रतिस्पर्धी उमेदवाराकडून मतदारसंघातील जनतेचे प्रश्न सुटावेत. त्यासाठी आपले निश्चित सहकार्य राहणार असल्याची ग्वाही चव्हाण यांनी दिली. माझ्यावर मतदार नाराज का झाले? मी कुठे कमी पडलो? याचे विश्लेषण मला करावे लागणार आहे. मी पदावर नसलो तरी कराडकरांची सेवा करत राहणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. आपल्यासाठी झटलेल्या सर्व कार्यकर्ते, मतदारांचे त्यांनी आभारही मानले.

Maharashtra CM Devendra Fadnavis Attends Shaurya Diwas Program In Panipat
…तर देशाचा इतिहास वेगळा असता! पानिपतमध्ये मराठा शौर्यदिनानिमित्त मुख्यमंत्र्यांचे योद्ध्यांना अभिवादन
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
cm devendra fadnavis address party workers at bjp state convention
सत्तेमुळे सुखासीन झाल्यास जनतेशी द्रोह ठरेल! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे परखड मतप्रदर्शन
PM Modi to youth: Step out of comfort zone to build Viksit Bharat by 2047
युवक देशाला २०४७पर्यंत विकसित करतील ; ‘विकसित भारत युवा नेता संवाद’ मध्ये पंतप्रधान मोदींचा विश्वास
Akola Municipal Corporation Election news in marathi
अकोला महापालिकेतील ‘प्रशासक राज’ केव्हा संपणार?; संभाव्य निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी, वर्चस्व राखण्याचे भाजपपुढे आव्हान
Image Of Zeenat Tigress
‘झीनत’मुळे का सुरू आहे पश्चिम बंगाल-ओडिशामध्ये वाद? एका वाघीणीमुळे दोन राज्यांमध्ये राजकीय तणाव!
गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे ते अजित पवारांचे विश्वासू; धनंजय मुंडेंचा असा आहे राजकीय प्रवास (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे ते अजित पवारांचे विश्वासू; धनंजय मुंडेंचा असा आहे राजकीय प्रवास
some bad decisions happened on eknath shinde tenure as chief minister says forest minister ganesh naik
एकनाथ शिंदे यांच्या कालखंडात काही चुकीच्या गोष्टी घडल्या; वनमंत्री गणेश नाईक यांचे विधान

हेही वाचा >>>Amol Khatal : आठ वेळा आमदार झालेल्या बाळासाहेब थोरातांचा पराभव करणारे अमोल खताळ कोण आहेत? जाणून घ्या!

राज्यातील सर्व सहकाऱ्यांशी बोलणार असून, निवडणुकीबद्दल निश्चितपणे बरेचशे तर्कवितर्क आहेत. त्यामुळे आताच एकदम भाष्य करणे योग्य नाही. काही लोकांचे म्हणणे आहे की निवांत झालो की बोलूया.हरियाणाचा निकाल थोडासा नकारात्मक गेला हे खरे आहे. त्याची चिंता आम्ही करत आहोत. महाविकास आघाडीने राज्यभर ठरवून काही जातीपातीचे राजकारण केले हे बिलकुल खरे नाही. मराठा आंदोलनाचा आणि महाविकास आघाडीचा थेट काही संबंध नाही. विरोधकांनी काही भूमिका घेतली. पण, त्याचा फार प्रभाव पडला नसल्याचे मत चव्हाणांनी व्यक्त केले.

हेही वाचा >>>Ajit Pawar : “अरे पठ्ठ्या, तू आमदार कसा होतो तेच बघतो”, अजित पवारांनी खुलं आव्हान दिलेला नेता जिंकला की हरला?

विधानसभेच्या २०१९ मधील निवडणुकीच्या तुलनेमध्ये याखेपेस खूप चांगला पाठिंबा मिळेल असे आपल्याला वाटले. पण, मतदारांनी एकदम राज्यभर असा धक्कादायक निर्णय का घेतला हा प्रश्न आहे. सगळे निकाल एकसारखे दिसत आहेत. सगळ्या जागा आमच्याच पडल्या आहेत. आम्ही महाविकास आघाडी म्हणून काम करायला कमी पडलो का? हे पाहणार असल्याचे चव्हाण म्हणाले.

आपणाला केंद्रात आणि राज्यात काम करायची संधी मिळाली. हे सगळे आपल्या मतदारांच्या आशीर्वादामुळे शक्य झाले. पण, मतदार का नाराज झाले, मी कुठे कमी पडलो याचे विश्लेषण मला करावे लागणार आहे. मी कोणत्याही पदावर असलो नसलो तरी कराडकरांची सेवा करत राहणार असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी या वेळी सांगितले.

Story img Loader