३० वर्षांपूर्वी मी अलिबागला आलो, इथे स्थायिक झालो. इथे येऊन मला जी शांतता मिळते, ती जगात कुठेच मिळत नाही. अलिबागकर असल्याचा सार्थ अभिमान आहे. असे प्रतिपादन भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केले ते कणकेश्वर फाटा येथे सुशोभिकरण सोहळ्यात बोलत होते.

    अलिबाग मांडवा रस्त्यावरील कणकेश्वर फाटा परीसराचे सुशोभिकरणाचा उद्घाटन सोहळा शनिवारी पार पडला. यावेळी ते प्रमुख पाहूणे म्हणून ते उपस्थित होते. समिरा उद्योग समुहाकडून या वाहतुक बेटाचे सुशोभिकरण करण्यात आले. या फाट्याला रवी शास्त्री यांचे नाव देण्यात आले. यावेळी नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री आदिती तटकरे, स्थानिक लोकप्रतिनिधी अधिकारी वर्ग मोठ्या संख्येनी उपस्थित होते.

Bachchu Kadu
“…म्हणून आम्ही दोन पावलं मागे घेतली”; बच्चू कडू यांचे गंभीर आरोप
Venkateswara Mahaswami who has stood on three Lok Sabha seats is in trouble
तीन लोकसभा जागांवर उभे राहिलेले व्यंकटेश्वरा महास्वामी अडचणीत; गुन्हा दाखल होणार
Bee attack on wrestling ground near Patan karad
पाटणजवळ कुस्ती मैदानावर मधमाशांचा हल्लाबोल; पहिलवानांसह १५ जण जखमी
bjp leader sanjay kshirsagar to join sharad pawar ncp
मोहोळमध्ये भाजपचे असंतुष्ट नेते संजय क्षीरसागर राष्ट्रवादी शरद पवार गटात, शरद पवारांच्या उपस्थितीत  होणार पक्षप्रवेश

 “भारतीय संघात खेळत असतांना मी १९९२ मध्ये अलिबागला आलो. आवास सासवणे परिसरात जागा घेतली, तिथेच स्थायिक झालो. या ३० वर्षांत मला अलिबागने जी शातंता दिली. प्रेम दिले ते जगात कुठेच नाही मिळाले.” असे उद्गार शास्त्री यांनी यावेळी काढले.

    तसेच, “जेव्हा टीम चांगले काम करते तेव्हा लोकांचे प्रेम मिळते. पण जेव्हा टीम हरते तर लोक रागही व्यक्त करतात. यावेळी आलेला ताण-तणाव, निराशा दूर करण्याचे काम अलिबाग करते. त्यामुळे अलिबागकर असल्याचा सार्थ अभिमान आहे. अलिबागमध्ये चांगले खेळाडू आहेत. जे आयपीएल, रणजीमध्ये तसेच देशाच्या संघातही स्थान मिळवू शकतात. पण त्यांना चांगल्या सोयी सुविधा मिळाल्या पाहीजे, संधी मिळायला पाहीजे.” असे मत देखील रवी शास्त्री यांनी यावेळी व्यक्त केले.