Bachhu Kadu on Mahayuti: प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांचा नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. त्यानंतर पक्षाच्या बैठकीत त्यांनी सत्ताधारी किंवा विरोधक यांच्यापैकी कुणाशी युती-आघाडी करावी, याबद्दल चर्चा केली. यावर भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना यासंबंधी प्रश्न विचारण्यात आला असता राधाकृष्ण विखे पाटील यांनी बच्चू कडू सारखे लोक महायुतीत नकोत, अशी भूमिका घेतली. तसेच बेताल विधान करणाऱ्या सर्वच नेत्यांना महायुतीने आता दूर ठेवावे, असेही ते म्हणाले.

“बच्चू कडू यांना महायुती सरकारने पाठबळ दिले. त्यांचे दिव्यांगाचे धोरण मान्य केले. तरीही सरकारशी प्रतारणा करून त्यांनी विश्वासघात केला. त्यामुळे त्यांना पुन्हा महायुतीत सामील करण्याची आवश्यकता आहे, असे वाटत नाही. साहजिकच हा निर्णय वरीष्ठ नेते घेतील. पण बच्चू कडू यांच्यासारख्या बेताल, बेजबाबदार वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीला पुन्हा घेतले जाईल, याची शक्यता कमीच वाटते. सरकारचे पाठबळ घेऊन सरकारचाच विश्वासघात करणारे बच्चू कडू असतील किंवा अन्य कुणीही असेल त्यांना पुन्हा महायुतीत घेऊ नये, अशी आमची मागणी आहे”, असे राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.

nashik BJP rebels girish mahajan
बंडखोरांचा पुन्हा भाजपमध्ये प्रवेश अवघड
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Rahul Gandhi Vs Arvind Kejriwal
Rahul Gandhi Vs Arvind Kejriwal : “केजरीवाल आणि पंतप्रधान मोदी यांच्यात फरक नाही, दोघेही…”; राहुल गांधींच्या टीकेला आप नेत्याचं जोरदार प्रत्युत्तर
Anil Deshmukh criticized BJP and amit shah
बोलघेवडेपणा करू नका!अमित शहा यांच्या नेत्यांना कानपिचक्या
Sanjay Raut on MVA
Sanjay Raut on MVA: महाविकास आघाडी फुटली का? संजय राऊतांनी केलं स्पष्ट; म्हणाले, “आम्ही भाजपामध्ये असताना…”
MVA rift grows as Shiv Sena ubt announces independent poll strategy
महाविकास आघाडीत धुसफुस; शिवसेनेच्या स्वबळाच्या नाऱ्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादीचीही स्वतंत्र लढण्याची तयारी
Image Of MVA
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ठाकरे गटाच्या स्वबळाच्या भूमिकेमागे नेमकी कारणं काय?
Vijay Wadettiwar On Thackeray group
Vijay Wadettiwar : “आम्ही उद्धव ठाकरेंना विनंती करू, अन्यथा…”, ठाकरे गटाच्या स्वबळाच्या घोषणेवर विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान

उद्धव ठाकरे बेताल व्यक्ती – विखे पाटील

विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा (ठाकरे) पराभव झाल्यानंतर आता नेत्यांकडून आता स्वबळाचा नारा दिला जात आहे. आगामी निवडणुकीत मविआला सोडून स्बळावर निवडणूक लढवू, अशी मागणी काही नेत्यांनी उद्धव ठाकरेंकडे केली आहे. या प्रश्नावर राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, पराभव झाल्यानंतर एकमेकांवर खापर फोडण्याचे काम सुरू आहे. आपला जनाधार राहिला नाही, हे विरोधकांनी मान्य करायला हवे. उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबद्दल बोलत होते, तशी त्यांच्याकडून अपेक्षा नव्हती. इतके बेताल विधाने करणारा माणूस मी पाहिला नव्हता. याचा धडा आता लोकांनी त्यांना शिकवला आहे.

हे वाचा >> चार वेळा अचलपूरचा गड राखला, यंदा कुठे चुकलं? पराभवानंतर बच्चू कडूंची उद्विग्न प्रतिक्रिया, म्हणाले…

ईव्हीएमवर खापर फोडणे चुकीचे

विधानसभेत पराभव झाल्यानंतर विरोधकांकडून आता ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत. याबद्दल बोलताना विखे म्हणाले, लोकसभेत तुम्हाला इतके घवघवीत यश मिळाले. महायुतीची पिछेहाट जाली. त्यावेळी त्यांनी ईव्हीएमवर प्रश्न का नाही उपस्थित केला? त्यांच्या खासदारांनी राजीनामा द्यायला हवा. सर्वोच्च न्यायालयानेही याबाबत स्पष्ट निकाल दिला आहे. जर विजय झाला तर ईव्हीएम चांगले आणि पराभव झाला तर ईव्हीएम वाईट, अशी ही गत आहे. शरद पवार यांना माझी विनंती आहे की, तुम्ही जनादेश गमावलेला आहे. तुम्ही अनेकांचे वाटोळे केले आहे. आता आणखी जनतेचे, राज्याचे वाटोळे करू नये, त्यांनी शांतपणे घरी बसावे, अशी टीका विखे पाटील यांनी केली.

हे वाचा >> “मराठा मुख्यमंत्री असेल तर…”, अमित शाह आणि विनोद तावडे यांच्यात ४० मिनिटं काय चर्चा झाली?

बच्चू कडू यांची भाजपावर टीका

“गरज सरो वैद्य मरो, असा अजेंडा भारतीय जनता पक्षाने वापरू नये. जर एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली नसती तर भारतीय जनता पक्ष सत्तेत आला नसता. तसेच आजचं चित्र वेगळं राहिलं असतं. त्यामुळे ही जी किमया आहे ती किमया एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे झाली आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्ष असं करेल असं वाटत नाही. एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रिपदासंदर्भातील दावेदारी योग्य आहे”, असे बच्चू कडू यांनी म्हटले होते.

Story img Loader