औरंगाबाद, जालना : राज्यातील जालना, औरंगाबाद, नाशिक आणि मुंबईमध्ये सळई उद्योगाशी संबंधित ठिकाणांवर प्राप्तिकर विभागाने छापे टाकले. त्यात १२० कोटींची करचुकवेगिरी उघड झाली असून, ५६ कोटींची रोकड, १४ कोटींचे सोने जप्त करण्यात आले. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

  १ ते ८ ऑगस्टदरम्यान प्राप्तिकर विभागाचे २०० पेक्षा अधिक अधिकारी आणि कर्मचारी जालना शहरात ठाण मांडून होते. नाशिकमधील पाच पथकांनी ही कारवाई केली. जालना औद्योगिक वसाहतीमधील एसआरजे पित्ती स्टील्स प्रा. लि. आणि कालिका स्टील्स अलॉय प्रा. लि. या दोन उद्योगांची नावे प्राप्तिकर छाप्याबाबत गेल्या आठवडाभरापासून चर्चेत आहेत. याशिवाय विमलराज सिंघवी तसेच प्रदीप बोरा या दोन व्यावसायिकांची नावेही प्राप्तिकर विभागाच्या छाप्यांच्या अनुषंगाने चर्चेत आहेत. गुरुवारी या छाप्यांतील बेहिशेबी मालमत्तेचे वृत्त आणि छाप्यांच्या वेळी सापडलेल्या कोटय़वधी रुपयांच्या नोटांची छायाचित्रे प्रसारमाध्यमांतून समोर आली. त्यामुळे प्राप्तिकर कार्यालयाच्या नाशिक येथील अन्वेषण आणि शोध विभागाने केलेल्या कारवाईची व्यापकता स्पष्ट झाली़

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raids factories gold confiscated income tax department action ysh
First published on: 12-08-2022 at 00:02 IST