कोकण वगळता राज्यात पुन्हा गारपीट होण्याबाबत हवामान खात्याने वर्तवलेला अंदाज खरा ठरला. तुळजापूर तालुक्यातील हंगरगा (नळ), नंदगाव, बोरगाव, सलगरा (म.), लोहगाव व गुजनूर या गावांना रविवारी रात्री गारपिटीने अक्षरश: झोडपून काढले. यामुळे द्राक्ष बागांसह ज्वारी, हरभरा, गहू या पिकांबरोबरच आंब्याचेही मोठे नुकसान झाले.
८ मार्च रोजी तुळजापूर तालुक्यातील हंगरगा, नंदगाव, बोरगाव, लोहगाव, सलगरा व गुजनूर या गावांना रात्री वादळी वारे व प्रचंड विजांच्या कडकडाटासह झालेल्या गारपिटीने अक्षरश: झोडपून काढले. या गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या ज्वारी, गहू व हरभरा या पिकांचे मोठे नुकसान झाले. गारपिटीचा सर्वात जास्त फटका द्राक्ष, पपई व डािळब या फळबागांना बसला. गारपीट व वादळी वाऱ्यामुळे द्राक्ष बागा अक्षरश: भुईसपाट झाल्या. आंबा पिकाचेही मोठे नुकसान झाले. आंबा, तसेच चिंचेच्या झाडाला पालाच शिल्लक राहिला नाही. याबरोबरच गारपीट व वादळी वाऱ्यामुळे अनेक मोठी झाडे उन्मळून पडली.
विशेष म्हणजे गेल्या वर्षी ज्या भागाला गारपिटीने झोडपून काढले, त्याच गावांना याही वेळी गारपिटीने झोडपून काढले. मोठय़ा गारा, वादळी वारे व विजांचा कडकडाट यामुळे या भागातील नागरिक भयभीत झाले होते. हंगरगा येथील जिलानी कुरेशी यांच्या द्राक्ष बागेसह अनेक शेतकऱ्यांचे गारपिटीमुळे प्रचंड नुकसान झाले. प्रशासनाने तत्काळ या गावाची पाहणी व नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आíथक मदत देणे गरजेचे ठरले आहे.
गारपिटीचा सर्वात जास्त फटका हंगरगा, नंदगाव, लोहगाव, सलगरा (मड्डी) या गावांना बसला. सतीश कोरे, मधुकर पोतदार, प्रकाश मधुळे, अरुण कुलकर्णी यांचे ज्वारी व गव्हाचे नुकसान झाले, तर नंदगाव येथील द्राक्ष बागायतदार सिद्धप्पा मोसलगे, नीलकंठ बशेट्टी यांच्या बागायती पिकांचे नुकसान झाले. काही वेळ झालेल्या गारपिटीने क्षणात होत्याचे नव्हते करून टाकले. गारपिटीमुळे शेतकरी पुन्हा एकदा कोलमडून पडला आहे.
उदगीर, निलंगा, देवणीत पुन्हा अवकाळीमुळे त्रेधा
वार्ताहर, लातूर
निलंगा, उदगीर, देवणी व औसा तालुक्यांतील काही गावांत रविवारी रात्री पुन्हा अवकाळी पाऊस बरसल्यामुळे शेतकऱ्यांची त्रेधातिरपीट उडाली.
हवामान खात्याने ८ ते १० मार्च दरम्यान अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. या अंदाजामुळे शेतकरी जागरूक होते. काहींनी हरभरा, गव्हाच्या राशी लांबवल्या होत्या. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान काहीअंशी टळले. मात्र, वारा व पावसामुळे फळबागांचे मोठे नुकसान झाले. देवणी तालुक्यात सुमारे दीड तास जोरदार पाऊस बरसला. वलांडी, शिरूर अनंतपाळ येथेही पावसाने हजेरी लावली. उदगीर परिसरातही पावसाने तारांबळ उडवली. निलंगा तालुक्यातील औराद शहाजनी, शेळगी, माळेगाव कल्याणी, तगरखेडा, निटूर, हाडगा, उमरगा, हलगरा, सावरी आदी गावांतही जोराचा पाऊस झाला. अवकाळी पावसासह जोराच्या वाऱ्यामुळे काही ठिकाणी आंब्याचा मोहोर पुन्हा गळून पडला. काही ठिकाणी कैऱ्यांचा सडा पडला. जिल्हाभरात आंब्याचे उत्पादन मोठे असते. परंतु गेल्या ३ वर्षांपासून आंब्याला मोहोर लागल्यानंतर येणाऱ्या वादळी पावसामुळे आंबा उत्पादनावर मोठा परिणाम होत आहे. सोमवारी दिवसभर हवामान कोरडे होते. दुपारी कडक ऊन होते. मात्र, शेतकऱ्यांनी अवकाळी पावसाचा चांगलाच धसका घेतला आहे.

Torrential rain with hail in Shirol and Hatkanangle taluka
शिरोळ, हातकणंगले तालुक्यात गाऱ्यांसह वळिवाची दमदार हजेरी; उन्हात गरव्याची सुखद अनुभूती
Auctions in market committees of Nashik district also stopped for fifth day
नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांतील लिलाव पाचव्या दिवशीही ठप्प
thane district, administration, thane water supply department
लोकसत्ता इम्पॅक्ट : ठाणे जिल्हा प्रशासन जागे झाले, पाणी टंचाई आधीच टँकर सुरू करण्याच्या दिल्या सूचना
domestic gas in Panvel
पनवेलमध्ये घरगुती गॅसचा काळाबाजार