सांगली/नाशिक : सांगली जिल्ह्याच्या पूर्व भागाला गुरुवारी सायंकाळी पावसाने झोडपले. यामुळे रब्बी ज्वारीला लाभ होणार असला तरी द्राक्ष, डाळिंबाला फटका बसणार आहे. गेल्या चार दिवसांपासून ढगाळ हवामान असून थंडीही गायब झाली आहे. तसेच नाशिक जिल्हा परिसरात गुरूवारी अनेक ठिकाणी पहाटेच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली.

हेही वाचा >>> नंदुरबार : घरासाठी केलेल्या पाण्याच्या टाकीत पडून दोन मुलांचा मृत्यू

unseasonal rain, Vidarbha, temperature, rain ,
विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता! किमान तापमानात वाढ
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Redevelopment , Developers Committee, Old Thane ,
जुन्या ठाण्यातील पुनर्विकासासाठी विकासकांची समिती
la nina become active in the pacific ocean impact on kharif crop
ला निना सक्रिय… रब्बी पिकांना फायदा? पण परिणाम अल्पकालीनच?
coconut prices increased loksatta news
बदलत्या हवामानामुळे नारळ उत्पादन घटले, श्रीफळ (नारळ) महागले
sunlight
हिवाळ्यात एक-दोन आठवडे आणि एक महिना सूर्यप्रकाशापासून दूर राहिल्यास काय होईल? तज्ज्ञांनी केला खुलासा…
Excessive use of chemical fertilizers disrupts the natural chain says MLA Arun Lad
रासायनिक खतांच्या बेसुमार वापरामुळे निसर्ग साखळी विस्कळीत – आमदार अरूण लाड
congress mla vijay wadettiwar criticize cm devendra fadnavis over crime increase in state
चंद्रपूर : वडेट्टीवार म्हणतात, ‘मुख्यमंत्री फडणवीसांचा धाक नाही, त्यामुळेच गुन्हेगारी…’

सांगलीत दिवसाचे तापमान ३१ अंश सेल्सियसपर्यंत होते, तर किमान तपमान २९ अंश सेल्सियस होते. गेल्या चार दिवसांपासून ढगाळ हवामान आणि पावसाचे वातावरण तयार झाले होते. दुपारच्या तीव्र उष्म्यानंतर सायंकाळी जत, कवठेमहांकाळ आणि मिरज पूर्व भागात अर्धा तास दमदार पाऊस झाला. पावसाने रानात पाणी साचले, तर कोळपणी झालेल्या शाळू पिकातही पाणी साचले. यामुळे शाळू पिकाला पोषक स्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, या भागात द्राक्ष पिके वेगवेगळ्या टप्प्यात आहेत. काही बागा फुलोऱ्यात तर काही बागातील माल काढणीला आला आहे. अशा अवस्थेत पाऊस झाल्याने तयार माल तडकण्याची भीती आहे.

नाशिक जिल्ह्यात पिकांचे नुकसान

पावसाने रब्बी हंगामातील कांदा रोप, कांदा पिके , गहू ,हरबरा ,द्राक्ष आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले . लाल कांदा व इतर पिकांच्या उत्पादनावर विपरित परिणाम होईल. याबाबत प्रशासनाकडून पंचनाम्याचे आदेश देण्यात आले आहे.

Story img Loader