Raj Thackeray in Nashik Speech : सोमवारी संध्याकाळी महाराष्ट्रातील निवडणुकीच्या प्रचारतोफा थंडावतील. त्यामुळे राज्यातील विविध भागांत आता शेवटच्या सभा घेण्याचं काम स्टार प्रचारक करत आहेत. परंतु, हा निवडणुकीचा काळ म्हणजे कंटाळवाणा असल्याचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलंय. ते आज नाशिकमध्ये बोलत होते.

राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये बरंच काम केलंय. महापालिका मनसेच्या हातात होती तेव्हा त्यांनी अनेक विकासकामे केल्याचा दावा केला जातोय. त्यामुळे नाशिकमधील निवडणूक राज ठाकरेंची अटीतटीची निवडणूक आहे. दरम्यान, निवडणुकीच्या निमित्ताने राज ठाकरेंनी महाराष्ट्रातील विविध मतदारसंघ पिंजून काढले आहेत. मतदारसंघांचे दौरे करताना त्यांची प्रकृतीही काल (१५ नोव्हेंबर) बिघडली होती. त्यामुळे काही ठिकाणी जाऊन त्यांनी फक्त मतदारांचे आशीर्वाद घेतले. आजही त्यांनी अनेक ठिकाणी भेटी दिल्या अन् भाषण करून मतदारांना मनसेला मतदान करण्याचं आवाहन केलं.

Uddhav Thackeray and rahul gandhi
इंडिया आघाडीत बिघाडी? विसंवादावरून ठाकरे गटाची काँग्रेसवर तोफ; म्हणाले, “हेवेदावे, जळमटे अन् कुरघोड्यांना…”
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
Image Of MVA Leaders
MVA : “महाविकास आघाडी उद्ध्वस्त होतेय, जनतेने त्यांना हाकलून दिले”, ठाकरे गटाचा स्वबळाचा नारा; अजित पवार गटाचा टोला
Devendra Fadnavis On Raj Thackeray or Uddhav Thackeray
Devendra Fadnavis : राज ठाकरे की उद्धव ठाकरे? देवेंद्र फडणवीसांनी दिलं राजकीय उत्तर; म्हणाले, “राजकारणात काहीही…”
What Uddhav Thackeray Said?
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचं वक्तव्य, “ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडले नाहीत ते सगळेजण…”
What Devendra Fadnavis Said About Uddhav Thackray?
Devendra Fadnavis : “चंद्रपूरचे आपण सगळेच वाली! कुणीही सुग्रीव नाही, मी कुणासारखा जोक…”; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला?
Image Of Yogesh Kadam
Raj Thackeray : “मनसेने मते खाल्ल्यामुळे आमचे १० उमेदवार पडले”, राज ठाकरेंच्या पक्षावर शिंदे गटाच्या मंत्र्याचा आरोप
What Rajiv Kumar Said?
Rajiv Kumar : राजीव कुमार यांची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता टीका, “हेलिकॉप्टर तपासलं गेल्यावर काहींनी घाणेरडी भाषा..”

हेही वाचा >> Pankaja Munde : “९० हजार बुथसाठी भाजपाकडून ९० हजार माणसं, त्यामुळे ऑक्सिजन…”, पंकजा मुंडेंचं तुफान भाषण!

सकाळ-संध्याकाळी उठून तेच बोलायचं

राज ठाकरे आज नाशिकच्या सभेत म्हणाले, “सकाळपासून संध्याकाळपर्यंत नुसती पकपक.. निवडणुका म्हणजे तुम्हाला सांगतो कंटाळवाण्या असतात. कधीतरी भाषण करणं ठीक असतं. पण निवडणुकीत सकाळ, संध्याकाळ तेच बोलायचं”, असं राज ठाकरे म्हणाले.

राज्यात सुरू असलेल्या जातीजातीच्या राजकारणावरून राज ठाकरेंनी मतदारांना आवाहन केलं. ते म्हणाले, “निवडणुका गेल्या तेल लावत. राजकीय पक्ष मेले तरी चालतील. पण महाराष्ट्र जगला पाहिजे. ती काळाची गरज आहे. ही सगळी मंडळी त्यापासून दूर लोटत आहेत. तालुक्यात विकास करू शकलो नाही, उद्योगधंदे करू शकलो नाहीत, यासाठी विष कालवलं जातंय. हे सर्व उद्योग यासाठी सुरू आहेत. आपण ही गोष्ट समजून घेतली पाहिजे की राजकारण काय सुरू आहे.”

दरम्यान, कालच्या प्रचारसभेत राज ठाकरे यांची भिवंडी येथे प्रकृती बिघडली होती. त्यामुळे त्यांनी तिथे भाषण न करताच निघून गेले. त्यांनी तिथे औषधोपचार घेऊन पुढच्या प्रवासाला निघाले.

Story img Loader