राज्याच्या विधिमंडळ अधिवेशनामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अनेक मुद्द्यांवरून शाब्दिकदृष्ट्या जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, त्याचवेळी बुधवारी विधानभवनात दोन्ही बाजूंमध्ये प्रत्यक्षच जुंपल्याचं पाहायला मिळालं. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी आणि शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांच्यामध्ये आधी बाचाबाची झाली. त्यानंतर हा प्रकार वाढला आणि दोन्ही बाजूचे आमदार एकमेकांना भिडले. हा प्रकार विकोपाला जात असतानाच तिथे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी येत विरोधी पक्षाच्या सदस्यांना तिथून जायला सांगितलं. या घटनाक्रमावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत असताना शर्मिला ठाकरे यांनी त्यावर खोचक शब्दांत टीका केली आहे.

एकीकडे राज ठाकरेंनी या प्रकारावर नाराजी व्यक्त केली असताना शर्मिला ठाकरे यांनी देखील त्यावरून संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरेंनी याविषयी बोलताना “महाराष्ट्रात असा प्रकार याआधी कधीही घडला नव्हता, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही”, असं विधान केलं आहे. यासंदर्भात बोलताना शर्मिला ठाकरेंनी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांना खोचक सल्ला दिला आहे.

narendra modi, PM Narendra Modi,
हुकमी ‘नॅरेटिव्ह’ने यंदा मोदींना हुलकावणी दिली आहे का?
loksatta explained article, bahujan vikas aghadi, hitendra thakur, politics, Vasai, Palghar
विश्लेषण : पालघर-वसईत हितेंद्र ठाकुरांशी सर्वच पक्षांना जुळवून का घ्यावे लागते? ठाकुरांच्या यशाचे रहस्य काय?
Manmohan Singh
अग्रलेख: बडबड बहरातील मौनी!
How much tax will be paid on the gift of 240 crores given by Narayan Murthy to his grandson
Money Mantra: नारायण मूर्तींनी नातवाला दिलेल्या २४० कोटींच्या भेटीवर किती टॅक्स बसणार?

“…म्हणजे अजून चांगली फ्रीस्टाईल होईल”

एका कार्यक्रमात माध्यमांशी बोलताना विधानभवनात झालेल्या राड्याविषयी शर्मिला ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. “मी त्या सगळ्या पक्षांना आवाहन करेन की पुढच्या वेळेपासून चांगल्या लोकांना उमेदवारी देण्यापेक्षा आपले पहेलवान, ज्युडो, कराटेवाल्यंनाच आमदारकी द्या. म्हणजे अजून चांगली फ्रीस्टाईल होईल”, असं शर्मिला ठाकरे म्हणाल्या.

“..याचा अर्थ आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाला ते घाबरतात”, शिवसेना नेत्याचं शिंदे गटाला प्रत्युत्तर!

“..पण या लोकांना त्याची काही पडलेलीच नाही”

“ही खूप लज्जास्पद बाब आहे. आपल्याकडे काहीही नाही. महाराष्ट्रातले रस्ते वाईट आहेत. पाण्याचे प्रश्न आहेत. पाऊस चालू झाल्यापासून गटारं वाहात आहेत. शेतकरी आत्महत्या करत आहेत. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळत नाहीयेत. कुठेही काहीही नीट नाहीये. पण या लोकांना त्याची काही पडलेलीच नाहीये”, असं म्हणत शर्मिला ठाकरेंनी सत्ताधारी आणि विरोधी पक्ष अशा दोन्ही बाजूंच्या वर्तनावर टीका केली आहे.