महाराष्ट्रात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार स्थापन झाल्यानंतर बराच काळ मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नव्हता. अलीकडेच या नवीन सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. मलाईदार खाती भारतीय जनता पार्टीला गेल्याने शिंदे गटातील आमदार नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. त्याचबरोबर शिंदे गटातील काही आमदारांना मंत्रीपदच मिळालं नाही, यामुळे तेही नाराज असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत.

या सर्व घडामोडीनंतर शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय गायकवाड यांनी मोठं विधान केलं आहे. सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात सर्व इच्छुक आमदारांना मंत्रीपदं मिळणार आहेत, असं त्यांनी म्हटलं आहे. बुलढाण्यात पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हे विधान केलं आहे.

eknath shinde
महायुतीच्या सर्व जागा बहुमताने निवडून येणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा, म्हणाले ‘शेतकऱ्यांना मदत…’
Shrikant Shinde
कल्याणमधून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर श्रीकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; भाजपा कार्यकर्त्यांवरही टीका, म्हणाले…
kolhapur lok sabha marathi news, kolhapur sanjay mandlik latest news in marath
काँग्रेस नेत्यांशी मैत्री विसरा, भाजपचा महायुतीच्या नेतेमंडळींना संदेश
Devendra Fadnavis criticizes the disgruntled and dissatisfied leaders of the party
“बसमध्ये जागा मिळाली नाही की बसमागे दगड मारत धावणारे असतात…”, देवेंद्र फडणवीस असे का म्हणाले?

हेही वाचा- ‘राष्ट्रवादीचा मोठा नेता जेलमध्ये जाणार’ म्हणणाऱ्या मोहित कंबोज यांना मिटकरींचा टोला, म्हणाले “कोणाच्या चड्डीचा नाडा…”

शिंदे गटातील आमदारांची नाराजी आणि शिंदे गटाला मिळालेल्या अतिरिक्त खात्यांबाबत विचारलं असता, संजय गायकवाड म्हणाले की, “याला अतिरिक्त खाते म्हणता येणार नाही. हे सर्व नेहमीचे खाते असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी चर्चा करून याचं वाटप केलं आहे. आता मंत्रिमंडळाचा विस्तार होणारचं नाही किंवा बाकीच्या आमदारांना मंत्रीपद मिळणारच नाही, असं जे कोणी लोकं बोलत आहेत. त्यांना मला सांगायचं आहे की, प्रत्येक कॅबिनेट खात्याला राज्यमंत्री द्यावाच लागतो, ही कायदेशीर तरतूद आहे.”

हेही वाचा- राष्ट्रवादीचा मोठा नेता तुरुंगात जाणार; मोहित कंबोज यांचं सूचक ट्वीट, सिंचन घोटाळ्याचाही केला उल्लेख

“त्यामुळे सप्टेंबर महिन्यात राज्यमंत्र्यांचा विस्तार होणार आहे, असं मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीही सांगितलं आहे. तसेच उर्वरित जे कोणी आमदार आहेत, ज्यांना मंत्रिपदाची इच्छा आहे, त्या सर्वांचा मंत्रिमंडळात समावेश होणार आहे” असंही गायकवाड यावेळी म्हणाले.