राज्यभरातले निवासी डॉक्टर संपावर गेले आहेत. त्यामुळे रूग्णांचे हाल होतं आहेत. अशात गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषद घेत संप मागे घेण्याचं आवाहन निवासी डॉक्टरांना केलं आहे. आम्हाला निवासी डॉक्टरांना भेडसावणाऱ्या समस्या माहित आहेत. निवासी डॉक्टरांनी आम्हाला १५ दिवसांचा अवधी द्यावा. उगाच संप करायचा म्हणून संप करू नका असं आवाहनही गिरीश महाजन यांनी केलं आहे.राज्यातल्या निवासी डॉक्टरांनी विविध मागण्यासाठी आजपासून संप पुकारला आहे. अतिदक्षता विभाग वगळता सर्व विभागांच्या सेवा बंद ठेवण्याचा इशारा मार्डने दिला. त्याच पार्श्वभूमीवर गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषद घेत निवासी डॉक्टरांना संप मागे घेण्याचं आवाहन केलं आहे.

निवासी डॉक्टरांचे अनेक प्रश्न आपण मार्ग लावली आहे. तसंच त्यांची जी एरिअर्सची मागणी आहे ती देखील आम्ही वित्तविभागाकडे दिली आहे. त्याचा पाठपुरावा सुरू आहे. आम्ही निवासी डॉक्टरांना हेदेखील सांगितलं की १५ दिवसात हा प्रश्न मार्गी लागेल. आम्ही सकारात्मक आहोत. सरकार सकारात्मक आहे अशात निवासी डॉक्टरांनी अशा प्रकारे संप पुकारणं योग्य नाही असं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.

satej patil
“बारक्यांनी नादाला लागू नका, कोणाला कधी चितपट करायचं…”, सतेज पाटलांचा महायुतीला इशारा; म्हणाले, “या चौकात काठी घेऊन…”
sadabhau khot loksatta news, sadabhau khot latest marathi news
“मंत्रिपद गेलं, गाड्या गेल्या, उरलो एकटाच!”, सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केली सत्तांतराची खंत
jitendra awhad ajit pawar l
“नशीब त्यांनी डॉक्टरांना विषाचं इंजेक्शन…”, अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून जितेंद्र आव्हाडांचा टोला
Uday Samant, Uddhav thackeray, Uddhav thackeray working style, Uday Samant criticise Uddhav thackeray, party mla left Uddhav thackeray, victory Confidence in mahayuti, lok sabha 2024,
“…म्हणून आम्ही सगळ्यांनी शिंदेंसह उठाव केला”; उदय सामंत यांनी नागपुरात सांगितली……

आम्ही सगळेच निवासी डॉक्टरांच्या अडचणी जाणून आहोत. मी या प्रयत्नात असतो की संपाची वेळ येऊ नये. सरकार तुमच्याशी चर्चाच करत नसतं तर संपाची भूमिका योग्य आहे. मात्र तसं काहीही घडलेलं नाही असंही गिरीश महाजन यांनी स्पष्ट केलं. आम्ही १४३२ लोकांच्या जागा भरण्यासाठी १५ दिवसांचा अवधी मागितला आहे. हायपॉवर कमिटीच्या मिटिंगचे निर्णयही आम्ही दाखवले. तरीही निवासी डॉक्टर हे ताणत असतील तर ते योग्य नाही असंही गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. माझ्याकडे त्यांनी मागण्या मांडल्या असत्या, चर्चा केली असती तर संपाची गरजच पडली नसती असंही गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.

मार्डच्या प्रमुख मागण्या काय आहेत?
रिक्त पदं भरण्याची मागणी प्रामुख्याने मार्डकडून करण्यात आली आहे

२०१८ पासूनचे थकीत रक्कम देण्याची मागणी केली गेली आहे

मेडिकल कॉलेजमध्ये असोसिएट आणि असिस्टंट प्रोफेसर या जागाही भरल्या गेलेल्या नाहीत त्या भरल्या जाव्यात अशीही मागणी केली गेली आहे

या प्रमुख मागण्या मार्डकडून केल्या गेल्या आहेत. या दोन मागण्यांसाठी राज्यातले निवासी डॉक्टर संपावर गेले आहेत. राज्यातील ५ हजारांहून अधिक निवासी डॉक्टर या संपात सहभागी

आम्हाला कुणावरही कारवाईची इच्छा नाही
तुम्ही या प्रकरणी मार्डच्या डॉक्टरांवर कारवाई करणार आहात का? असा प्रश्न विचारला असता गिरीश महाजन म्हणाले की आम्हाला कुणावरही कारवाईची इच्छा नाही. मागच्या पाच वर्षात आम्ही कुणावरही कारवाई केलेली नाही. मार्डच्या डॉक्टरांनी आमच्यासमोर यावं आणि आमच्याशी समस्यांबाबत चर्चा करा असंही आवाहन गिरीश महाजन यांनी केलं.