बंद पडलेले साखर कारखाने सुरू होणं शेतकरी आणि कामगार यांच्या हिताचे आहे. यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी शनिवारी इस्लामपूर येथे बोलताना व्यक्त केले. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे साखर कामगारांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात खा. पवार बोलत होते. यावेळी कामगार मंत्री हसन मुश्रीफ, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, कृषी राज्यमंत्री डॉ. विश्‍वजित कदम यांच्यासह आ. मानसिंगराव नाईक, सुमनताई पाटील, अरूण लाड कामगार संघटनेचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे, सरचिटणीस शंकरराव भोसले, राजारामबापू कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील आदी उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्वागताध्यक्ष या नात्याने पालकमंत्री जयंत पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी बोलताना खा. पवार म्हणाले, सहकारी साखर कारखानदारीपुढे गैरव्यवस्थापनामुळे अडचणी वाढल्या.मात्र, सतत कारखाने बंद राहू लागले तर यंत्रसामग्रही गंजून खराब होते. कारखाने बंद पडणे हे शेतकर्‍यांना व साखर उद्योगाला परवडणारे नाही. यावर आता गांभीर्याने विचार करायला हवा. कारखाने बंद पडले की जिल्हा बँकांवर याचा बोजा येतो. परिणामी जिल्हा बँकेचा एनपीए वाढतो.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Restart closed sugar factories is in the interest of farmers said ncp leader mp sharad pawar rmm
First published on: 28-05-2022 at 19:41 IST