राज्यातला मराठा आरक्षणाचा प्रश्न काही दिवस मागे पडला असला तरी आता तो पुन्हा एकदा उफाळून आला आहे. खासदार संभाजीराजे छत्रपतींनी आता पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी कंबर कसली आहे. मराठ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर लाँग मार्च काढण्याची घोषणाही संभाजीराजेंनी केली आहे.

छत्रपती संभाजीराजे आज जनसंवाद यात्रेनिमित्त सोलापूर जिल्हा दौऱ्यावर होते यावेळी मोहोळमध्ये पत्रकारांशी चर्चा करताना त्यांनी पुणे ते मुंबई लाँग मार्च काढणार असल्याचे सांगितल. ते म्हणाले, “लाँग मार्चची घोषणा केली असली तरी लाँग मार्च व्हावा अशी आमची इच्छा नाही. गेल्या सात- आठ महिन्यात आम्ही अनेकदा राज्य शासनासमोर आम्ही अनेक प्रश्न मांडले आहेत. आरक्षणाच्या बाबतीत असो किंवा इतर बाबतीत राज्याने व केंद्राने आपापली जबाबदारी पार पाडायला हवी”.

uddhav balasaheb thackeray criticized mahayuti candidate sandipan bhumre
मद्य परवान्यांचा विषय ठाकरे गटाकडून ऐरणीवर; उमेदवारी जाहीर होताच भुमरे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न
chavadi political situation in maharashtra ahead of lok sabha election diwali organized by political leaders
‘सत्ता खूप वाईट, नंतर कुणी चहा सुद्धा पाजत नाही’, सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केली खंत
bhavana gawali lok sabha marathi news
भावना गवळींची नाराजी मिटली? उद्योगमंत्र्यांनंतर मुख्यमंत्र्यांनीही….
Sharad pawar udyanraje bhosle satara lok sabha election
उदयनराजेंना महायुतीने डावललं तर तुम्ही तिकीट देणार का? शरद पवारांनी कॉलर उडवत दिलं उत्तर…

ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा.

संभाजीराजे पुढे म्हणाले, “आरक्षणाच्या व्यतिरिक्त ज्या मूलभूत सुविधा आहेत, त्याबद्दल आम्ही वेळोवेळी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं, मूक आंदोलन केलं. त्यातूनही काही निष्पन्न होत नाही. परवा त्यांनी आम्हाला एक पत्रही पाठवलं पण ते बोगस होतं. बोगस म्हणणं चुकीचं आहे. ते पत्र चुकीचं होतं कारण ते सरकारी बाबूंनी लिहिलेलं पत्र होतं. मी त्यांच्या पत्राला उत्तर दिलं की तुम्हाला चुकीचं कोणीतरी सांगितलं आहे. पण त्याला त्यांचं काही उत्तर आलेलं नाही. अशीच परिस्थिती असेल, गरीब मराठ्यांचं नुकसान होत असेल तर आम्हाला लाँग मार्च काढण्यावाचून पर्याय उरणार नाही”.