शिवसेनेतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर या संघर्षाने टोकेचे स्वरुप धारण केले आहे. दोन्ही बाजूचे नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीयेत. असे असताना रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांनी थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले आहे. करोना महासाथीच्या काळात ते घराबाहेर पडले नाहीत. वर्षा बंगला सोडताना एखादी मुलगी सासरी जात असल्याचे सोंग उद्धव ठाकरे यांनी केले, अशी खोचक टीका भुमरे यांनी केली. ‘टीव्ही ९ मराठी’ने याबाबतचे वृत्त दिले आहे.

हेही वाचा >>> “तर मग आम्हालाही खरं सांगत…”, दीपक केसरकरांचा उद्धव ठाकरेंना इशारा,आदित्य ठाकरेंनाही टोला!

sharad pawar devendra fadnavis (1)
“..तर त्यांनी किती कोलांटउड्या घेतल्या हे कळेल”, फडणवीसांच्या ‘त्या’ टीकेला शरद पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले…
shiv sena workers stopped narayan rane campaigning
रत्नागिरीत प्रचारपत्रकावरून भाजप-सेनेचे नाराजीनाटय
solapur, Rahul Gandhi, pm narendra modi, Rahul Gandhi Criticizes Modi, Favoritism Towards Industrialists, rahul gandhi in solapur, praniti shinde, solapur lok sabha seat, lok sabha 2024, election 2024, marathi news, solapur news, bjp, congress
लोकसभा निवडणूक हातून निसटत असल्याने मोदी घाबरले, राहुल गांधी यांचा हल्लाबोल
manoj jarange
मनोज जरांगेंची प्रकृती बिघडली, छत्रपती संभाजीनगरच्या रुग्णालयात दाखल

उद्धव ठाकरे अडीच वर्षे ते कोणालाही दिसले नाहीत. आपण त्यांना फक्त टीव्हीमध्ये पाहात होतो. आम्हालाही टीव्ही सुरू केल्यानंतरच उद्धव ठाकरे दिसायचे. टीव्ही बंद केला की ते गायब व्हायचे. करोनाकाळात एवढे संकट आलेले होते. मात्र उद्धव ठाकरे एकाही जिल्ह्यात गेले नाहीत. आदित्य ठाकरे यांनीही एखाद्या ठिकाणाला भेट दिली नाही. मात्र आता त्यांना सगळीकडे जाण्यासाठी वेळ आहे, असे संदीपान भुमरे म्हणाले.

हेही वाचा >>> उद्योगपती मुकेश अंबानी आणि एकनाथ शिंदे यांच्यात बैठक, कोणत्या विषयावर झाली चर्चा?

मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवसस्थान असलेल्या वर्षा बंगल्यामधून उद्धव ठाकरे यांना बाहेर पडायचे होते. मात्र त्याच दिवशी त्यांना करोनाची लागण झाली. त्यांच्या तोंडाला आदल्या दिवशी मास्क होते. मात्र जेव्हा वर्षा बंगला सोडायचा होता, तेव्हा एखादी मुलगी सासरी जात असल्याचे त्यांनी सोंग घेतले. रडारड सुरू होती, अशी घणाघाती टीका संदीपान भुमरे यांनी केली.