राज्यात शिंदे-फडणवीस सरकारचा अखेर दीड महिन्याने मंत्रीमंडळ विस्तार झाला. यात एकनाथ शिंदे गटातून नऊजणांना संधी मिळाली. मात्र, त्यानंतर शिवसेनेतून बंडखोरी करणाऱ्या शिंदे गटातून काहीसा नाराजीचा सूरही निघत आहे. बच्चू कडूंनी जाहीर नाराजी व्यक्त केली. ज्या आमदारांनी सर्वात आधी शिवसेनेत बंडखोरी करत शिंदे सहभागी होणाऱ्या आणि गुवाहाटीला जाणाऱ्यांना मंत्रिमंडळात समावेश झाला नाही, असाही आरोप होतोय. यावर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

संजय गायकवाड म्हणाले, “काही लोक मागून आले हे खरं जरी असलं तरी हा विस्तार झाला तो कॅबिनेट मंत्र्यांचा झाला आहे. फारसे आमदार नाराज आहे असे मला वाटत नाही.”

lok sabha 2024, Vijay Wadettiwar Alleged BJP Entry, Dharmarao Baba Aatram , Chandrasekhar Bawankule , gadchiroli lok sabha seat, election 2024, Dharmarao Baba Aatram alleges Vijay Wadettiwar, congress, bjp, ajit pawar ncp, gadchiroli news, marathi news
“विजय वडेट्टीवार यांना मंत्रिपदाच्या काळातही भाजपात येण्याची घाई झाली होती…” धर्मरावबाबा आत्राम यांचा गौप्यस्फोट; म्हणाले, “त्या बैठकीत मी…”
eknath shinde
महायुतीच्या सर्व जागा बहुमताने निवडून येणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा, म्हणाले ‘शेतकऱ्यांना मदत…’
The decision to take Eknath Shinde and Ajit Pawar along with them is the BJP leaders in the state
एकनाथ शिंदे,अजित पवार यांना बरोबर घेण्याचा निर्णय राज्यातील भाजप नेत्यांचाच! केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांचा दावा
Congress Kolhapur
काँग्रेसशी मैत्री पुरे ! कोल्हापुरातील सेनेच्या दोन्ही खासदार, पालमंत्र्यांना भाजप कार्यकर्त्यांनी सुनावले

“बच्चू कडूंना कॅबिनेटची अपेक्षा होती का?”

“आमदार बच्चू कडू यांची प्रतिक्रिया मी पाहिली आहे. त्यांना अपेक्षा होती की आपला पहिल्या रांगेत नंबर लागला पाहिजे. मागच्या काळात ते राज्यमंत्री होते आणि राज्यमंत्र्यांचा विस्तार अजून बाकी आहे. त्यांना कॅबिनेटची अपेक्षा होती का, तशी त्यांनी मागणी केली होती का हे मला माहिती नाही,” असं गायकवाड यांनी सांगितलं.

“बच्चू कडूंना राज्यमंत्रीपदाची अपेक्षा असेल तर…”

ते पुढे म्हणाले, “बच्चू कडूंना राज्यमंत्रीपदाची अपेक्षा असेल तर तो पुढच्या महिन्यामध्ये विस्तार होणार आहेत. गेल्या महिन्याभरापासून प्रलंबित असलेला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार राजभवनावर ९ ऑगस्ट रोजी १८ मंत्र्यांचा शपथविधी पार पडला.”

हेही वाचा : “मी मुख्यमंत्र्यांना पुन्हा आठवण करून द्यायला आलो की…”, एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर धनंजय मुंडेंचं वक्तव्य

“पहिल्या टप्प्यात शिंदे गट आणि भाजपाकडून प्रत्येकी नऊ अशा एकूण १८ मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला,” असंही गायकवाडांनी नमूद केलं.