अजित पवार, नाना पटोले हे सगळे राज्यातले प्रमुख नेते आहेत. समर्थकांनी नाना पटोलेंचं बॅनर लागलं आहे. ते काही नेत्यांनी लावायला सांगितलं नाही. अतिउत्साही कार्यकर्त्यांनी ते बॅनर लावलं आहे असं म्हणत नाना पटोले भावी मुख्यमंत्री या बॅनरवर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसंच अजित पवारांविषयी जे बोललो त्याचा मला खेद वाटतो असंही त्यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले संजय राऊत?
“मला अजित पवारांविषयी अर्धवट माहिती देऊन प्रश्न विचारला गेला. अजित पवारांनी तुमच्याविषयी असं असं बोलले, ते असं बोलले नाहीत. माझा आणि अजित पवारांचा स्वभाव स्पष्ट बोलण्याचा असल्याने आम्ही पटकन बोलून जातो. अजित पवार
नेमकं काय घडलं होतं?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
अजित पवारांनी काय म्हटलं होतं?
“आपली काही संस्कृती, परंपरा आहे, इतिहास आहे. आपल्याला सगळ्यांनी यशवंतराव साहेबांनी सुसंस्कृत महाराष्ट्र कसं काम करू शकतो याबाबत दाखवून दिलं आहे, असं अजित पवार म्हणाले. तसंच, संजय राऊतांची दुसरी बाजू ऐकायला मिळाली की त्यांना कसालतरीही त्रास होतोय. परंतु, प्रत्येकाने तारतम्य ठेवून बोलावं”, असं अजित पवार (२ जून) म्हणाले होते.
संजय राऊत अजित पवारांविषयी काय म्हणाले होते?
प्रत्येकाने तारतम्य ठेवून बोलावं असं अजित पवारांनी म्हटल्यानंतर पत्रकारांनी याबाबत संजय राऊतांना विचारले. “धरणांमध्ये मुतण्यापेक्षा थुंकणं चांगलं”, असं जोरदार प्रत्युत्तर संजय राऊत यांनी दिलं. तसंच “ज्याचं जळतं त्याला कळतं”, असंही संजय राऊत म्हणाले आहेत. “आम्ही भोगतो आहोत. आम्ही सगळं भोगूनही जमिनीवर उभे आहोत. मी माझ्या पक्षाबरोबर ठामपणे उभा आहे. आमच्या मनात पक्ष बदलण्याचा आणि संकटं येत आहेत म्हणून भाजपासारख्या पक्षाबरोबर सूत जुळवण्याचा आमचा विचार होत नाही”, असंही संजय राऊत म्हणाले.
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.