नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाचा वाद एकीकडे वाढत असताना दुसरीकडे राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी होत असल्याचं पाहायला मिळत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीशी आघाडी केल्यावरून भाजपाकडून सातत्याने ठाकरे गटाला लक्ष्य केलं जात असताना त्यावरून आता संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “बाळासाहेबांनी ज्यांना आयुष्यभर विरोध केला, त्यांच्याशी उद्धव ठाकरेंनी आघाडी केली”, अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी केल्यानंतर त्यावरून आता संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना खोचक टोला लगावला आहे. “फडणवीसांना काहीही बोलू द्या. बाळासाहेबांनी कधीही व्यक्तींना विरोध केला नाही. काही भूमिकांना विरोध केला असेल. देवेंद्र फडणवीसांकडून बाळासाहेब शिकण्याची वाईट वेळ आमच्यावर अजून आलेली नाही”, असं संजय राऊत म्हणाले.

devendra fadnavis hhagan hujba
मराठा आरक्षणावर भुजबळ फडणवीसांची भाषा बोलतायत? विरोधकांच्या आरोपांवर उपमुख्यमंत्री म्हणाले, “आम्ही दोघांनी…”
What Devenddra Fadnavis Said?
उद्धव ठाकरेंना भाजपाची ऑफर? देवेंद्र फडणवीस म्हणाले, ” ज्यादिवशी ते…”
mahendra thorve dada bhuse news
विधानभवनात शिंदे गटाचे आमदार थेट मंत्र्यांनाच भिडले; कारण विचारताच म्हणाले, “…म्हणून माझी दादा भुसेंशी बाचाबाची झाली!”
Sita & Akbar: How names of two lions became the reason for a plea in Calcutta High Court
अकबराची बहीण लक्ष्मी? अकबर, सीता, तेंडुलकर आदी नावं प्राण्यांना द्यायची पद्धत कशी पडली?

“नाना पटोले म्हणजे इंग्रजी चित्रपट…”, प्रकाश आंबेडकरांचा टोला; म्हणाले, “नेमकं टार्गेट कोण हे…!”

“देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या पक्षाविषयी बोलावं. बाळासाहेबांनी कधी बेईमानांना मांडीवर घेतलं नव्हतं. गद्दारांना लाथा घालून हाकलून द्या असं सांगितलं होतं. पण देवेंद्र फडणवीस काल गद्दारांच्या गाड्या चालवत होते. काय त्यांच्यावर वेळ आलीये ही”, असंही संजय राऊत म्हणाले.

“तुम्ही हिंदू आहात ना?”

दरम्यान, देवेंद्र फडणवीसांनी ‘सापनात आणि नागनाथ एकत्र आले तरी मोदींचा पराभव करू शकणार नाहीत’ अशी टीका केल्याबद्दल पत्रकारांनी विचारणा केली असता त्यावरूनही संजय राऊतांनी टीका केली आहे. “सापनाथ आणि नागनाथाची इथे लोक पूजा करतात. तुम्ही हिंदू आहात ना? आपल्या देशात सापनाथ आणि नागनाथांची पूजा केली जाते. तुम्हाला त्यात त्रास व्हायचं कारण काय?” असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला आहे.