भोकरदन तालुक्यातील कुंभारी गावाच्या परिसरात पोहण्यास गेलेल्या दोन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. करण राजेंद्र साळवे (वय १२) व पंकज सुरेश कांबळे (वय १२) अशी या विद्यार्थ्यांची नावे आहेत. गावच्या शिवारातील नाला बांधावरील पाण्यात ते उतरले होते. दुपारी शाळेतून घरी आल्यानंतर ते बाहेर गेले होते. पालकांनी ते घरी आले नाहीत म्हणून त्यांचा शोध घेतला. नाला बांधाच्या काठावर त्यांचे कपडे दिसले. तेथील पाण्यात शोध घेतला असता दोघेही मृतावस्थेत आढळले. भोकरदन पोलिसांनी घटनास्थळास भेट देऊन पंचनामा केला.