Sharad Pawar On Local Body Election : विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं. मात्र, महाविकास आघाडीला पराभवाचा मोठा धक्का बसला. महायुतीला मिळालेल्या बहुमतानंतर राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं. ५ डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तसेच अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. सरकार स्थापन झालं असलं तरी अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार बाकी आहे. दरम्यान, दुसरीकडे महाविकास आघाडीला विधानसभेच्या निवडणुकीत आलेल्या अपयशानंतर आघाडीतील नेत्यांकडून पराभवाची कारणं काय? यावर विचारमंथन करण्यात येत आहे.

यातच विधानसभेच्या निवडणुकीत आलेल्या अपयशामुळे महाविकास आघाडीचं भविष्य काय? असा सवाल सत्ताधाऱ्यांकडून अनेकदा विचारला जातो. यातच आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढणार की स्वतंत्र? याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत. आता यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी महाविकास आघाडीची पुढील रणनीती काय असेल? यावर भाष्य केलं आहे.

Image Of Supriya Sule And Ajit Pawar
Supriya Sule : “मी बोलते, पण अजित पवार माझ्याशी…”, पवार कुटुंबीयांतील दुराव्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
uddhav Thackeray Devendra fadnavis
“पुढील मकर संक्रांतीपर्यंत ठाकरे-फडणवीस एकत्र”, आमदार रवी राणांचा दावा
Anna Bansode statement over Sharad Pawar praise RSS
Sharad Pawar: मविआचं पुढं काय होणार? राष्ट्रवादीचे खासदार महायुतीत जाणार? शरद पवारांनी केलं स्पष्ट; म्हणाले…
Guardian Minister Controversy
Manikrao Kokate : पालकमंत्री पदाचा तिढा कधी सुटणार? अजित पवार गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, “आता निर्णय…”
Devendra Fadnavis and Sharad Pawar (1)
Sharad Pawar : बीडप्रकरणी शरद पवारांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन; म्हणाले, “राजकारणात मतभेद असतील-नसतील, पण…”
Hasan Mushrif
Hasan Mushrif : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत हसन मुश्रीफ यांचं विधान चर्चेत; म्हणाले, “आता पुढील निवडणुकीच्या…”
Vijay Wadettiwar On Devendra Fadnavis
Vijay Wadettiwar : ‘देवेंद्र फडणवीसांनी आता नरेंद्र मोदींचं वारसदार व्हावं’, विजय वडेट्टीवार यांचं मोठं विधान

हेही वाचा : देवेंद्र फडणवीस यांचं शरद पवारांच्या पराभवाच्या गणिताला गणितानेच उत्तर; म्हणाले, “तुमच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याकडून…”

शरद पवार काय म्हणाले?

विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला अपयश आलं. आता पुढे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहेत. मग आता पुढच्या काळात महाविकास आघाडीची रणनीती काय असेल? असा प्रश्न पत्रकार परिषदेत शरद पवार यांना विचारला असता ते म्हणाले की, “आम्ही सर्व एकत्रित आगामी निवडणुकीला सामोरं जाणार आहोत. निवडणुकीत जय आणि पराजय होत असतात, त्यामुळे ना उमेद व्हायचं नसतं. मी आयुष्यात १४ निवडणुका लढलो. मी कधी पराभव पाहिला नाही. मात्र, या निवडणुकीत राज्यात आम्हाला पराभव पाहायला मिळाला. जरी पराभव झाला असला तरी त्याची चिंता करायची नाही. लोकांमध्ये जायचं आणि काम करायचं. आज लोक देखील अस्वस्थ असल्याचं दिसंत. लोकांमध्ये उत्साह दिसत नाही. कारण निवडणुका झाल्यानंतर एक वातावरण असतं ते वातावरण महाराष्ट्रात दिसत नाही”, असं शरद पवार म्हणाले.

ईव्हीएमसंदर्भात शरद पवार काय म्हणाले?

“ईव्हीएमवर आमची शंका नाही. कारण त्यासंबंधी ठोस असे पुरावे माझ्या हातात नाहीत. पण मतदानाच्या आकडेवारीवरून काही प्रश्न निर्माण होत आहेत. काँग्रेस पक्षाला ८० लाख मते पडली आणि त्यांचे फक्त १६ आमदार निवडून आले. तर शिवसेना शिंदे गटाला ७९ लाख मते मिळाली आहेत, तर त्यांचे ५७ आमदार निवडून आले आहेत. म्हणजे एक लाख कमी मतदान मिळूनही जवळपास ४१ आमदार अधिक निवडून आले आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाची मते ७२ लाख आहेत. पण आमदार निवडून आले फक्त १० आणि राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाला ५८ लाख एवढे मतदान मिळाले, पण त्यांचे ४१ आमदार निवडून आले आहेत.”

Story img Loader