यंदाच्या दसऱ्याला चाळीस गद्दार आणि फितुरांना गाडण्याचा निर्धार केला जाणार आहे. निष्ठेची वज्रमूठच घट्ट आवळली जाणार आहे. एक घाव दोन तुकडे, आज हिशेब चुकता होणार आहे, अशी टीका ‘सामना’तून शिंदे गटावर करण्यात आली आहे. यावरुन आता शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.

“गेल्या अडीच वर्षांत उद्धव ठाकरेंनी हिंदूत्वाच्या विचाराचे एक घाव दोन तुकडे केले आहेत. राजकारणात आता दोन गट पडले असले तरी, मनाची आणि विचारांची विभागवारी अडीच वर्षापूर्वीच झाली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीसह जात उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांची अंमलबजावणी केली का?,” असा सवाल शहाजी बापू पाटील यांनी उपस्थित केला आहे.

वसंत मोरेंच्या प्रश्नावर राज ठाकरेंनी ‘अशी’ दिली प्रतिक्रिया, म्हणाले…
aditya thakceray on shinde group candidate change
“ज्यांनी दिली साथ, त्यांचा केला घात; हेच शिंदे गटाचं ब्रीदवाक्य”, उमेदवार बदलण्यावरून आदित्य ठाकरेंची टीका; म्हणाले…
Hindu Code Bill and Dr Babasaheb Ambedkar Marathi News
Hindu Code Bill: बाबासाहेबांचा राजीनामा; पंडित जवाहरलाल यांची भूमिका नक्की काय घडले होते?
suspense continues over vijay wadettiwar and mla pratibha dhanorkar for lok sabha candidate for chandrapur
विजय वडेट्टीवार की प्रतिभा धानोरकर? सस्पेन्स कायम; तेली समाजापाठोपाठ कुणबी समाजाचाही इशारा

हेही वाचा – पंकजा मुंडेंचं दसरा मेळाव्यातील सभेत मोठं विधान, “२०२४ ला पक्षाने तिकीट दिलं तर…”

“बाळासाहेब ठाकरेंना माननारे शिवसैनिक…”

शिवसैनिकाची गर्दी शिवाजी पार्कवर होणार आहे, असा दावा केला जात आहे. याबाबत विचारले असता शहाजी बापू पाटील म्हणाले, “राष्ट्रवादी आणि काँग्रेसबरोबर युती केलेली शिवसेना कडव्या शिवसैनिकाला त्यांची वाटत नाही. बाळासाहेब ठाकरेंचा विचार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढे चालवला आहे. त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंना मानणारे शिवसैनिक बीकेसी मैदानावर येतील.”

हेही वाचा – PM मोदींचा उल्लेख करत महादेव जानकर म्हणाले, “पंकजा मुंडेच्या एका…”

“राष्ट्रवादीने उद्धव ठाकरेंना एकत्र घेत…”

विरोधी पक्षनेते अजित पवारांनी कटुता ठेऊ नये, असा सल्ला शिवसेना आणि शिंदे गटाला दिला आहे. त्यावर पाटील यांनी सांगितलं, “शिवसेना आणि भाजपा यांच्यात कायम कटुता निर्माण करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीने केला. २०१४ साली शिवसेनेला बाजूला करत राष्ट्रवादी भाजपासह सरकार स्थापन करत होती. तसेच, २०१९ साली भाजपा शिवसेना सरकार स्थापन होणार होते. मात्र, राष्ट्रवादीने उद्धव ठाकरेंना एकत्र घेत सरकार स्थापन केले. ते जनतेला आवडले नाही,” अशा शब्दांत शहाजी बापू पाटील यांनी राष्ट्रवादीचा समाचार घेतला आहे. ते टीव्ही ९ या वृत्तवाहिनीशी बोलत होते.