scorecardresearch

Premium

“…म्हणून गद्दारी झाली”; आदित्य ठाकरे यांचं मोठं विधान, म्हणाले…

माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे यांनी गद्दारी का झाली? याबाबत मोठं विधान केलं आहे.

Aaditya-Thakrey
आदित्य ठाकरे (संग्रहित फोटो)

अनेक राजकीय घडामोडीनंतर महाराष्ट्रात सत्तांतर झालं आहे. शिवसेना आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना राजीनामा द्यावा लागला. एकाच वेळी ४० आमदार सोडून गेल्याने शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा पक्षबांधणीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. याच पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे निष्ठा यात्रेच्या माध्यमातून लोकांची आणि शिवसैनिकांची भेट घेत आहेत.

दरम्यान, माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे यांनी गद्दारी का झाली? याबाबत मोठं विधान केलं आहे. महाविकास आघाडी सरकार सुरळीत सुरू असताना काही जणांना महाराष्ट्राबाबत पोटदुखी होती. महाराष्ट्राचं नाव उज्ज्वल होतंय, महाराष्ट्र पुढे चाललंय, हे काही लोकांना बघवलं नाही, त्यामुळे गद्दारी झाली, असं विधान आदित्य ठाकरे यांनी केलं आहे.

virat kohli
विराट कोहलीची विश्वचषकातून माघार? तातडीने मुंबईला रवाना झाल्याने चर्चांना उधाण
kitchen tips in marathi how to make roti with tea strainer kitchen jugaad video viral
Kitchen Jugaad: चपातीवर चहाची गाळणी नक्की फिरवा; अशी कमाल होईल की तुम्ही विचारही केला नसेल, काय ते VIDEO मध्ये पाहा
उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीने कोणते कपडे घालावेत, हे ठरवणारे तुम्ही कोण?
Sharad Pawar NCP
“ते सहसा माझ्या शब्दाला नकार देत नाहीत”; शरद पवारांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा, म्हणाले…

पाहा व्हिडीओ –

निष्ठा यात्रेबाबत बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, “सगळीकडेच लोकांचं प्रेम आणि आशीर्वाद शिवसेनेसोबत आहेत. सामान्य नागरिक असतील किंवा राजकीय लोक असतील, त्यांना माहीत आहे, शिवसेना पक्ष प्रमुख आणि कुटुंबप्रमुखांच्या पाठीत खंजीर खुपसला गेला होता. त्यामुळे सगळीकडेच शिवसैनिकांचं प्रेम आणि आशीर्वाद पाहायला मिळत आहे. जे अराजकीय लोक आहेत ते देखील महाराष्ट्रात जी सर्कस झाली, त्यावर लक्ष ठेवून होते. आम्ही महाराष्ट्रात फिरत आहोत. ही प्रेम यात्रा आहे, निष्ठा यात्रा आहे. आम्ही लोकांना भेटत आहोत, कुणावरही आरोप करत नाही ना कुणावर टीका करत आहोत,” असंही आदित्य ठाकरे म्हणाले.

हेही वाचा- “…आता सगळ्यांच्या हातात खंजीर”, संजय राऊतांकडून बंडखोर आमदारांवर टीकास्त्र!

पुढे त्यांनी सांगितलं की, “आमच्या पाठीत खंजीर खुपसला, याचं नक्कीच दु:ख आहे. अजूनही दिसतंय सर्वकाही सुरळीत चाललं होतं. पण कुठे ना कुठे काहींच्या मनात महाराष्ट्राबाबत पोटदुखी होती. महाराष्ट्राचं नाव उज्ज्वल होतंय, महाराष्ट्र पुढे जातोय, हे बघवत नव्हतं. म्हणून ही गद्दारी झाली.”

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shivsena leader aaditya thackerays big statement on betrayed and rebel mla rmm

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×