काँग्रेस नेते राहुल गांधी यांना लोकसभा सचिवालयाने अपात्र ठरवलं आहे. यावर शनिवारी ( २५ मार्च ) राहुल गांधी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ‘माझं नाव सावरकर नाही, गांधी आहे, गांधी कधी माफी मागत नाही,’ अशी टीप्पणी केली होती. यावरून आज ( २६ मार्च ) शिवसेना ( ठाकरे गट ) उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधींना इशारा दिला आहे. सावरकरांचा अपमान सहन करणार नाही, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

मालेगावच्या एमएसजी (मसगा) कॉलेजच्या मैदानावर उद्धव ठाकरेंची सभा पार पडली. तेव्हा बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “राहुल गांधींनी प्रश्न विचारला २० हजार कोटी रूपये कोणाचे? त्यावरती भाजपाकडे उत्तर नाही आहे. हिंडेनबर्ग हजारो कोटी रूपयांचे घोटाळे काढत आहे. पण, भाजपा त्याला किंमतही देत नाही. पंतप्रधान उत्तरही देत नाही. आमच्याकडे साध्या-साध्या लोकांच्या पाठीमागे ईडी, सीबीआय लावून घोटाळे काढण्यात येत आहेत.”

nitin gadkari congress marathi news, nagpur lok sabha nitin gadkari latest marathi news
नितीन गडकरी म्हणतात, “ज्यांना अटक होण्यापासून वाचवले तेच आज विरोधात…”
nagpur, Anurag Thakur, Criticizes Congress, india alliance leaders no trust, no trust on rahul gandhi, rahul gandhi s leadership, bjp, lok sabha 2024, nda, election 2024,
“राहुल गांधींवर जनतेचा विश्वास नाही,” अनुराग ठाकूर यांची टीका; म्हणाले, “काँग्रेसमध्ये…”
Satyaki Savarkar
Rahul Gandhi Case : “पोलीस तपासांत एवढा विलंब का?”, सात्यकी सावरकर यांचा थेट सवाल
shrikant shinde uddhav thackeray omar abdullah
“ओमर अब्दुल्लांना जाब विचारण्याची हिंमत तरी ठेवा”, श्रीकांत शिंदेंचा उद्धव ठाकरेंना’त्या’ विधानावरून टोला!

हेही वाचा : “ठाकरेंपासून शिवसेना तोडू शकतो असं भाजपाला…” उद्धव ठाकरेंचं भाजपाला आव्हान

“फक्त राहुल गांधींना एक सांगायचं आहे, तुम्ही कन्याकुमारी ते काश्मीर चालला. संजय राऊत आणि आम्हीही तुमच्याबरोबर होतो. ही लढाई लोकशाहीची आहे. मात्र, राहुल गांधींना जाहीरपणे सांगत आहे, स्वातंत्र्यवीर सावरकर आमचं दैवत आहे. त्यांचा अपमान पटणारा नाही. लढायचं तर दैवतांचा अपमान सहन करणार नाही,” असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

हेही वाचा : “सुहास कांदेला रस्त्यावर फेकायचंय आणि…”, मालेगावातून संजय राऊतांचा शिंदे गटावर हल्लाबोल!

“सावरकरांनी १४ वर्षे छळ सोसला. ते सुद्धा एकप्रकारे बलिदान आहे. जसे क्रांतीकार फाशी गेले, गोळ्या खाऊन बलिदान दिलं. तसेच, १४ वर्षे मरण यातना सहन करण येड्यागबाळ्याचं काम नाही. त्यामुळे राहुल गांधींना सांगतो, देशाची लोकशाही वाचवण्यासाठी आपण एकत्र आलो आहोत. त्याच्यात फाटे फुटू देऊ नका. मुद्दामन तुम्हाला डिवचलं जात आहे. आता वेळ चुकली, तर आपला देश हुकूमशाहीकडे गेल्याशिवाय राहणार नाही,” असेही उद्धव ठाकरेंनी म्हटलं.