“राजकारणात आम्ही सतत एकमेकांविरोधात उभं राहतो, पण संकटसमयी कुटुंब म्हणून सदैव पाठिशी”, असल्याची प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे. पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “ही नोटीस हे संकट नाही, एक प्रक्रिया आहे. काय निष्पन्न होणार नाही. उद्धव ठाकरेंनी हे जाहीरपणे सांगितलं आहे”. तसंच ही परीक्षा असते, तटस्थपणे पाहायला हवं. आम्ही राज ठाकरेंच्या पाठिशी आहोत असंही त्यांनी म्हटलं आहे.
राज ठाकरे चौकशीसाठी सहकुटुंब पोहोचल्याने सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सत्यनारायणाच्या पुजेला गेलेत का ? असा टोला मारला आहे. यावर बोलताना संजय राऊत यांनी सत्यनारायणाची असो की श्रावणाची पूजा…नसती उठाठेव नको. संकटसमयी कुटुंबसोबत असणं साहजिक आहे असं उत्तर दिलं आहे.