फेंगल चक्रिवादळाचा तडाखा समुद्रकिनारी भागात बसला असून गुलाबी थंडी अचानक गायब झाली आहे. तसेच आज सोमवारी दिवसभर ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. सिंधुदुर्ग जिल्ह्याला ३ व ४ डिसेंबर रोजी यलो अलर्ट देण्यात आलेला असून हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची, ३० ते ४० किमी प्रती तास वेगाने वारे वाहण्याची व गडगडाट होवून विजा चमकण्याची शक्यता जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून वर्तविण्यात आलेली आहे.

मागच्या २४ तासात पुन्हा थंडीचा जोर ओसरला आहे. फेंगल चक्रिवादळाचा धोका कमी झाला असला तरी त्याचे परिणाम अजूनही हवामानावर दिसून येत आहेत. फेंगल चक्रिवादळाचा समुद्रकिनारपट्टीलगतच्या भागांवर मोठा परिणाम दिसत आहे. ऐन थंडीत पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागाने काही जिल्ह्यांमध्ये अलर्ट जारी केला आहे.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा – VIDEO : लोणावळ्यात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये फ्रीस्टाइल हाणामारी; व्हिडीओ व्हायरल

हेही वाचा – पिंपरी : अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी मावळातील तरुणांचे साहस, ८०० फुटांवरुन झळकावला तीस फुटी फलक

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज रिमझिम पावसाच्या सरी बरसतील, ३ आणि ४ डिसेंबर रोजी पावसाचा जोर वाढेल. विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गुलाबी थंडीची चाहूल लागली होती. त्यामुळे आंबा व काजू बागायतदार खुष दिसत असतानाच अचानक हवामानातील बदल झाला. त्यामुळे मोहर टिकविण्यासाठी बागायतदार यांना तारेवरची कसरत करत औषधे फवारणी करावी लागेल.

Story img Loader