सोलापूर: लोकशाही, संविधान, धर्मनिरपेक्षता संपुष्टात आणू पाहणा-या भाजपची उलटी गणती सुरू झाली आहे. भाजपला नेस्तनाबूत करण्यासाठी विरोधी पक्षांची तीन मुद्यांवर एकजूट होत आहे. त्याचा परिणाम आगामी काळात दिसून येईल, असा विश्वास माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी व्यक्त केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गुरूवारी, सोलापूर भेटीसाठी आल्यानंतर येचुरी यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध राजकीय मुद्यांवर भाष्य केले. यावेळी पक्षाचे पाॕलिट ब्रुरो सदस्य डॉ. अशोक ढवळे, डॉ. उदय नारकर, पक्षाचे जिल्हा सचिव एम. एच. शेख आदी उपस्थित होते.देशातील आर्थिक, सामाजिक, शेती, उद्योग आदी सर्व क्षेत्रातील परिस्थिती गंभीर बनत चालली असून सामान्य जनतेच्या दररोजच्या जगण्यावर हल्ला होत आहे. मोदी सरकारला त्याची चिंता नाही, अशी टीका करीत येचुरी म्हणाले, नवी दिल्लीत लैंगिक अत्याचाराच्या विरोधात महिला मल्लांचे आंदोलन चिरडले जात असताना दुसरीकडे पंतप्रधान मोदी हे नव्या संसद इमारतीचे राजेशाहीच्या थाटात उद्घाटन करण्यात मश्गूल होते. जणू ते स्वतःचा राज्याभिषेक करून घेत होते. महिला मल्लांच्या आंदोलनाविषयी मोदी काहीही बोलत नाहीत. मणिपूरमध्ये हिंसाचार पुन्हा वाढला आहे. त्याकडेही मोदी लक्ष देत नाहीत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sitaram yechury believes that the opposition is united on three points against the bjp solapur amy
First published on: 01-06-2023 at 19:30 IST