रत्नागिरी : रत्नागिरी शहरात गुरुवारी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास मारुती मंदिर येथे २२ हजार लिटर पेट्रोल भरलेला टँकर (एम एच ०८ एपी ०७७७) च्या टायर मधून धूर येऊ लागल्याने एका नागरिकाच्या सतर्कतेमूळे मोठा अनर्थ टळला. टँकरने पेट घेण्या आगोदरच रत्नागिरी नगर परिषदेच्या अग्निशामक यंत्रणेने टँकरच्या टायरमधून येणाऱ्या धूरावर पाणी मारले.

रत्नागिरीतील एका पेट्रोल पंपाच्या मालकीचा टँकर पेट्रोल घेऊन दुपारी एक वाजता मिरज इथून निघाला होता. तो उद्यमनगर येथील एका पंपावर पेट्रोल खाली करण्यासाठी जात असताना ही घटना घडली. टायरच्या कल्च प्लेटा गरम झाल्याने हा धूर येत असल्याचे निष्पन्न झाले आहे. शहरातील एका नागरिकाला हा प्रकार लक्षात आल्याने त्याने तात्काळ टँकर चालकाला सांगितले.

Three-year-old boy trapped in gallery after window locked
बुलढाणा : आई बाहेर, चिमुकला गॅलरीत ‌‌अन् ‘फ्लॅट’चे दार ‘लॉक’…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Car Cabin Bad Smell
तुमच्याही गाडीमध्येही सतत घाणेरडा दुर्गंध येतो? मग एका स्वस्तातल्या सोप्या उपायाने गाडी आतून होईल फ्रेश
Union Carbide waste disposal issue
‘युनियन कार्बाईड’च्या कचऱ्याचा प्रश्न उग्र का झाला? हा कचरा मूळ वायूइतकाच अतिधोकादायक? दुर्घटनेची शक्यता किती?
Ukraine cuts off Russian natural gas supplies
युक्रेनकडून रशियन नैसर्गिक वायूचा पुरवठा खंडित… नैसर्गिक वायूसाठी युरोपचे रशियावरील अलंबित्व खरेच संपले?
The young man poured petrol on the snake
“देव माफ करेल कर्म नाही” तरुणानं सापावर पेट्रोल टाकलं अन् माणसांमध्ये जास्त विष असतं हे सिद्ध केलं; VIDEO पाहून संतापले लोक
Farmer Suicide Attempt Somthana , Buldhana District ,
VIDEO : धक्कादायक ! खरेदी केंद्रावरच शेतकऱ्याने अंगावर घेतले पेट्रोल! ओरडत म्हणाला…
vehicle caught fire Bhusawal, gas set repair Bhusawal,
जळगाव : भुसावळमध्ये गॅस संच दुरुस्तीवेळी मोटारीचा पेट

आणखी वाचा-बारसू रिफायनरी प्रकल्पावरुन महायुतीत जुंपली

त्यानंतर तात्काळ रत्नागिरी नगर परिषदेच्या अग्निशमन दलाचे कर्मचारी व एमआयडीसीचे कर्मचारी तात्काळ घटनेच्या ठिकाणी हजर झाले पाणी मारून गाडीचे टायर थंड केले. वेळीच नागरिकांनी दाखवलेल्या प्रसंगावधाने मोठी दुर्घटना टळली. रत्नागिरीत गॅस टँकर मधून काही दिवसापूर्वी वायू गळती झाल्यानंतर आता पेट्रोल टँकर मधून धूर येण्याच्या प्रकार घडला. महामार्गाच्या कामामुळे रस्त्याची झालेल्या दुरावस्थेमुळे असे अपघात होत असल्याने रत्नागिरीत आता घबराटीचे वातावरण पसरले आहे.

Story img Loader