सोलापूर :बांगलादेशात अराजकता माजल्यानंतर हिंदू समाजावर मोठ्या प्रमाणात अन्याय, अत्याचार होत आहेत. अनेक मंदिरांची नासधूस होत आहे.या बाबीची केंद्रातील मोदी सरकारने गंभीर दखल घेऊन कठोर पावले उचलावीत, अशी मागणी सोलापुरातील सर्व जात-धर्म एकता मंचने केली आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना मंचच्या शिष्टमंडळाने भेटून निवेदन सादर केले आहे. १९७२ साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या खंबीर नेतृत्वाखाली भारत सरकारने पाकिस्तानला धडा शिकवून बांगलादेशाची निर्मिती करण्यात मोठा वाटा उचलला होता. परंतु याच बांगलादेशात अलीकडे राजकीय अराजकता माजल्यानंतर तेथील हिंदू समाजाला मोठ्या प्रमाणात लक्ष्य बनविले जात आहे. हिंदू कुटुंबीयांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात हिंसाचार होत असून मंदिरांचीही नासधूस केली जात आहे. ही बाब तमाम भारतीयांच्या दृष्टीने अस्वस्थ करणारी संतापजनक ठरली आहे. केंद्रातील मोदी सरकारने या प्रश्नावर वेळीच कठोर पावले उचलून बांगला देशातील हिंदू समाजावरील वाढते अन्याय अत्याचार थांबवावेत. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःची आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा पणाला लावावी, अशी मागणी या शिष्टमंडळाने केली आहे.

हेही वाचा : Sudhir Mungantiwar : “कर्नाटक सरकारला याचा हिशेब द्यावा लागेल”; सुधीर मुनगंटीवार यांचा इशारा, कारण काय?

mumbai High Court encroachment Sanjay Gandhi Udyan
संजय गांधी उद्यान अतिक्रमणमुक्तच हवे, उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला खडेबोल
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Naga Sadhus Enchant Devotees At Triveni Sangam on Makar Sankranti
संक्रातीच्या मुहूर्तावर ‘अमृत स्नान’; नागा साधूंना पहिला मान; त्रिवेणी संगमावर भाविकांचा महापूर
Haryana BJP chief Mohan Lal Badoli and Jai Bhagwan
Mohan Lal Badoli: भाजपाच्या नेत्यावर सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल; पीडित तरुणीने सांगितली अत्याचाराची आपबिती
West Bengal vs Odisha on tigers
West Bengal vs Odisha on Tigers : वाघांच्या मुद्द्यावर पश्चिम बंगाल विरुद्ध ओडिशा संघर्ष… यापूर्वीही प्राण्यांवरून जगभरात झालेत वाद
national women commission form fact finding committee in murder of a girl Inside bpo premises
‘बीपीओ’च्या आवारातील युवतीच्या खूनप्रकरणी सत्यशोधन समिती; राष्ट्रीय महिला आयोगाचा निर्णय; दहा दिवसांत अहवाल
Special article on occasion of Swami Vivekanandas birth anniversary
धर्म, अस्मिता आणि हिंदू!
nitin gadkari
Nitin Gadkari : करोना, दंगली, लढायांपेक्षा अधिक मृत्यू अपघातांमुळे… खुद्द गडकरींनीच…

अखिल भारतीय मराठा महासंघाचे दास शेळके, वीरशैव लिंगायत समाजाचे विजयकुमार हत्तुरे, मुस्लीम समाजाचे रसूल पठाण, शीख समाजाचे पोपटसिंग टाक, ख्रिश्चन समाजाचे जेम्स जंगम, जैन समाजाचे पराग शहा यांच्यासह वडार समाजाचे शंकर चौगुले, जांबमुनी मोची समाजाचे देवेंद्र भंडारे, वीरशैव गवळी समाजाचे सागर कलागते, धनगर समाजाचे राज सलगर, बंजारा समाजाचे युवराज राठोड, चर्मकार समाजाचे संजय शिंदे, कोळी समाजाचे गणेश कोळी, नवबौद्ध समाजाचे प्रमोद गायकवाड, मातंग समाजाचे सुरेश पाटोळे, ब्राह्मण समाजाचे अजित कुलकर्णी, बेरड समाजाचे शाम धुरी आदींचा या शिष्टमंडळात समावेश होता.

Story img Loader