सोलापूर :बांगलादेशात अराजकता माजल्यानंतर हिंदू समाजावर मोठ्या प्रमाणात अन्याय, अत्याचार होत आहेत. अनेक मंदिरांची नासधूस होत आहे.या बाबीची केंद्रातील मोदी सरकारने गंभीर दखल घेऊन कठोर पावले उचलावीत, अशी मागणी सोलापुरातील सर्व जात-धर्म एकता मंचने केली आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना मंचच्या शिष्टमंडळाने भेटून निवेदन सादर केले आहे. १९७२ साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या खंबीर नेतृत्वाखाली भारत सरकारने पाकिस्तानला धडा शिकवून बांगलादेशाची निर्मिती करण्यात मोठा वाटा उचलला होता. परंतु याच बांगलादेशात अलीकडे राजकीय अराजकता माजल्यानंतर तेथील हिंदू समाजाला मोठ्या प्रमाणात लक्ष्य बनविले जात आहे. हिंदू कुटुंबीयांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात हिंसाचार होत असून मंदिरांचीही नासधूस केली जात आहे. ही बाब तमाम भारतीयांच्या दृष्टीने अस्वस्थ करणारी संतापजनक ठरली आहे. केंद्रातील मोदी सरकारने या प्रश्नावर वेळीच कठोर पावले उचलून बांगला देशातील हिंदू समाजावरील वाढते अन्याय अत्याचार थांबवावेत. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःची आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा पणाला लावावी, अशी मागणी या शिष्टमंडळाने केली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा