जवळपास साडेपाच महिने एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे विस्कळीत झालेली एसटीची सेवा हळुहळू पूर्वपदावर आली आहे. रायगड जिल्ह्यात एसटीच्या १ हजार ६९८ फेऱ्या सुरु झाल्या आहेत. त्यामुळे जनसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेषतः ग्रामीण भागातील प्रवाशांचे हाल थांबले आहेत.

विलिनीकरण व इतर मागण्यांसाठी गेल्या दिवाळीपासून एसटी कर्मचारी संपावर गेले होते. त्यामुळे एसटीची सेवा ठप्प झाली होती. संपाचा तिढा काही केल्या सुटत नव्हता. विलिनीकरणाच्या मुद्द्यावर कर्मचारी ठाम होते. प्रकरण न्यायालयात गेले शेवटी न्यायालयाने कर्मचाऱ्यांना एप्रिल महिन्यात कामावर हजर होण्याचे निर्देश दिले. यानंतर संपकरी कर्मचारी कामावर परतले. यामुळे आता एसटीची सेवा हळुहळू पुर्वपदावर आली आहे. जिल्ह्यातून दररोज १ हजार ६९८ एसटीच्या फेऱ्या सुरू झाल्या आहेत.

uran potholes marathi news
उरण: खोपटे-कोप्रोली मार्गावर खड्ड्यांचे विघ्न कायम, एकाच ठिकाणी खड्डे कसे? प्रवाशांचा सवाल; कोट्यवधी रुपये खर्च करूनही दुरवस्था
Troubled by unruly rickshaw driver at Panvel station Suffering continues despite taking action
बेशिस्त रिक्षाचालकांचा पनवेल स्थानकात अडसर; कारवाई करूनही मुजोरी कायम, प्रवाशांचे हाल
navi mumbai, Valve Repair, Traffic Congestion, footpath close, Pedestrian Woes, kopar khairane, teen taki area, marathi news,
व्हॉल्व दुरुस्तीच्या कामामुळे पादचाऱ्यांचे हाल; कोपरखैरणेत तीन टाकी परिसरात पदपथ बंद
A decrease in the supply of new houses was recorded in eight metros of the country print news
नवीन घरांच्या पुरवठ्यात घट, यंदा पहिल्या तिमाहीत ६९ हजारांवर; गेल्या वर्षीच्या तुलनेत १५ टक्के कमी

ग्रामीण भागातील प्रवाशांना मोठा दिलासा

रायगड जिल्ह्यातील पेण ३४३, अलिबाग २२६, महाड १३२, श्रीवर्धन २००, कर्जत २३८, रोहा २३४, माणगाव २१३ आणि मुरुड ६९ फेऱ्या सुरू झाल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. प्रवाशांची होणारी गैरसोय कमी झाली आहे. एसटी संपामुळे प्रवाशांना खासगी प्रवासी साधनांचा वापर करावा लागत होता.

खासगी वाहतुकदारांकडून प्रवाशांचं आर्थिक शोषण

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा फायदा घेत खासगी वाहतुकदारांनी दरही वाढवले होते. त्यामुळे प्रवाशांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत होता. आता एसटी बस सेवा सुरू झाल्याबरोबर खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्यांनीही दर कपात केली आहे. त्यामुळे प्रवाशांची लूटही थांबली आहे.

हेही वाचा : “बँक कोणाच्या बापाच्या घरची नाही, त्यामुळे…”, सदावर्तेंची एसटी बँक निवडणुकीबाबत मोठी घोषणा

“दर्जेदार सेवा देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार”

रायगड विभाग नियंत्रक अनघा बारटक्के म्हणाल्या, “एसटीची बस सेवा दिर्घकाळ बंद असल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. आता कर्मचारी कामावर परतल्याने एसटी सेवा जोमाने सुरू झाली आहे. फेऱ्याही वाढल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय दूर होणार आहे. दर्जेदार सेवा देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.”