धाराशिव : दि. २५ : एसटीची भाडेवाढ झाली आहे. आता त्यापाठोपाठ चांगल्या सुधारणाही करणार आहोत. दरवर्षी एसटी महामंडळाच्या ताफ्यात नवीन पाच हजार बसेस दाखल होतील. पुढील पाच वर्षात एकूण २५ हजार नवीन बस गाड्या घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. धाराशिव जिल्ह्यासाठी नवीन ५० लालपरी बसगाड्या देत असल्याची घोषणा राज्याचे परिवहनमंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केली.

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पालकमंत्री सरनाईक यांनी कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी जिल्ह्याला नवीन ५० लालपरी देत असल्याची घोषणा करीत पहिल्याच दौऱ्यात जिल्ह्याला आनंदाची बातमी दिली.

Only 60 lakhs for each Koliwada allegations of insufficient funds
प्रत्येक कोळीवाड्यासाठी अवघे साठ लाख, निधी अपुरा असल्याचा आरोप
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
26 highly dangerous buildings in Thane are occupied by residents municipality issued notices four months in advance
ठाण्यात २६ अतिधोकादायक इमारती रहिवास व्याप्त, चार महिने आधीच खबरदारी घेत पालिकेने बजावल्या नोटीसा
Mumbais Water for All policy provided 7868 new water connections by December 2024
सर्वांसाठी पाणी धोरणाअंतर्गत १५ हजार अर्ज, ७८६८ जोडण्या दिल्या
100 bed hospital in Uran is stalled again causing another delay after fifteen years
उरणचे उपजिल्हा रुग्णालयाची प्रतीक्षाच, मंजुरी आणि भूमिपूजनानंतरही इमारतीचे काम रखडलेलेच
women given special discounts by builders in thane
ठाण्यात बिल्डरांकडूनही लाडक्या बहिणींना विशेष सवलत; यंदाच्या मालमत्ता प्रदर्शनात १०० हून अधिक गृहप्रकल्पांचे स्टॉल
thane municipal corporation expects 2062 crores in taxes with 1138 crores collected so far
ठाणे महापालिकेची ५५ टक्केच कर वसुली, दोन महिन्यात ९२४ कोटींच्या कर वसुलीचे पालिकेपुढे आव्हान
Deonar waste land for Dharavi project Revenue Department requests Municipal Commissioner to provide land
देवनार कचराभूमीची जमीन धारावी प्रकल्पाला; जमीन देण्याची महसूल विभागाची पालिका आयुक्तांना विनंती

धाराशिव शहरात बसस्थानाकाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. एप्रिल महिन्याच्या आत हे काम पूर्ण होईल. आणि त्यानंतर हे सुसज्ज बसस्थानक प्रावशी बांधवांसाठी सुरू होईल. राज्यातील विद्यार्थ्यांसाठी सुरू असलेल्या विविध योजना सुरूच राहणार आहेत. त्यात कोणत्याही प्रकारचा बदल केला जाणार नाही. अन्य राज्यातील एसटी कश्याप्रकारे चालते. याचा अभ्यास करून अन्य राज्यातील चांगली कामे आपल्या राज्यातही स्वीकारली जातील असेही मंत्री सरनाईक यांनी यावेळी सांगितले. तुळजाभवानी देवीचे तीर्थक्षेत्र विकसित करीत असताना भाविक, स्थानिक व्यापारी आणि पुजारी बांधवांना विश्वासात घेऊनच विकासकामे केली जातील अशी ग्वाहीही पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी दिली. त्यांच्यासमवेत आमदार राणाजगजितसिंह पाटील, माजी आमदार ज्ञानराज चौगुले, माजी खासदार प्रा. रवींद्र गायकवाड, जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.

Story img Loader