रत्नागिरी : शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपामुळे रत्नागिरी जिल्हा परिषदेचा कारभार पूर्णपणे ठप्प झाला असून विकासकामांच्या बिलांसह विविध योजना आणि पाणीटंचाईचे प्रस्ताव रखडले आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमध्ये मिळून एकूण सुमारे ११ हजारांहून जास्त कर्मचारी कार्यरत आहेत. त्यात प्राथमिक शिक्षकांची संख्या सर्वाधिक आहे. जिल्हा परिषद मुख्य इमारतीत साडेतीनशेहून अधिक कर्मचारी आहेत. त्यातील सेवानिवृत्त होणार असलेले काही मोजके कर्मचारी आणि अधिकारी कार्यालयात कार्यरत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विविध विभागांमध्ये कंत्राटी पद्धतीने नेमलेले कर्मचारी उपस्थित आहेत; पण उर्वरित बहुसंख्य कर्मचारी राज्यव्यापी संपात उतरल्यामुळे जिल्हा परिषद कार्यालयात शुकशुकाट आहे. जिल्हा प्रशासनाने शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचे आवाहन केले होते; मात्र कर्मचारी मागण्यांवर ठाम राहिल्याने सर्व विभागांचे मार्चअखेर मंजुरी आवश्यक असलेले प्रस्ताव रखडले आहेत. वर्षभरात केलेल्या विकासकामांची बिले खर्ची टाकण्यासाठी या महिन्यात लेखा विभागामध्ये धांदल उडालेली असते. बिले घेण्यासाठी ठेकेदारांचीही मोठी वर्दळ असते; पण संपामुळे लाखो रुपयांची बिले टेबलांवर पडून आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Strike of the government employees proposals of the development plans were stop ysh
First published on: 18-03-2023 at 00:02 IST