नागपूर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपाला धक्का बसला असून महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर अडबाले हे विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपाचे उमेदवार नागोराव गाणार यांचा पराभव केला. पहिल्या फेरीच्या मतमोजणीत अडबाले यांना १४०७१, तर गाणार यांना ६३०९ मते मिळाली आहेत. दरम्यान, या पराभवानंतर भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

हेही वाचा – MLC Elections Result: “सत्यजीत तांबे भाजपात जाणार नाहीत, कारण…”, दीपक केसरकरांनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाले, “पाठिंबा.,,”!

Union Home Minister Amit Shah will visit Akola on March 5 to review five constituencies in Vidarbha
लाेकसभेच्या तोंडावर अमित शाह विदर्भात, अकोल्यात ५ मार्चला पाच मतदारसंघांवर भाजपचे मंथन; शिंदे गटाच्या मतदारसंघांचा…
Aam Aadmi Party Lok Sabha Elections 2024 candidates
भाजपाच्या विरोधात आम आदमी पार्टीचे चार उमेदवार लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात; कोण आहेत सोमनाथ भारती?
Rane Bhaskar Jadhav edge of conflict
कोकणातील निवडणुकीला राणे- भास्कर जाधव संघर्षाची किनार
chandrapur independent mla kishor jorgewar marathi news, mla kishor jorgewar shivsena marathi news
अपक्ष आमदार जोरगेवार यांचं ठरलं! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कानात सांगितलं; शिवसेनेकडून आगामी विधानसभा निवडणूक लढणार?

काय म्हणाले सुधीर मुनगंटीवर?

“नागपूरची जागा २०१०च्या आधी १८ वर्ष काँग्रेस समर्थित उमेदवारांच्या ताब्यात होती. मी भाजपाचा प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर १८ वर्षांनंतर ती जागा आमच्या ताब्यात आली. गेली १२ वर्षी ती जागा भाजपाकडे होती. साधारणत: विजय झाल्यानंतर माजायचं नाही, पराभव झाल्यानंतर गाजायचं नाही, या तत्वावर आम्ही काम करतो. त्यामुळे या पराभवानंतर नक्कीच विश्लेषण करू. जिथे उणीव असेल, ती भरून काढण्याच्या दृष्टीकोनातून आम्ही प्रयत्न करू”, अशी प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

हेही वाचा – MLC Election : नागपूरमधील भाजपाच्या पराभवानंतर ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “हा पराभव…”

“शिक्षकांच्या जुन्या पेंशनच्या मुद्द्यामुळे भाजपाला फटका बसल्याची चर्चा असताना, याबाबतही त्यांनी प्रतिक्रिया दिली. जुनी पेंशन योजना ही काँग्रेसच्या काळातील समस्या होती. त्याचा दोष जर आम्हाला दिला जात असेल तर हे दुर्देव आहे”, असे ते म्हणाले.

हेही वाचा – Maharashtra MLC Election Results Live: अजित पवारांच्या काँग्रेसला कानपिचक्या; म्हणाले, “सत्यजीत तांबेंना जर…!”

“कोणत्याही निवडणुकीत विजय असो किंवा पराभव दोन्ही गोष्टींचं विश्लेषण झालं पाहिजे. अनेकदा विजय झाल्यानंतर आपण शांत बसतो. पण विजय झाल्यानंतर त्याचं योग्य विश्लेषण केलं नाही. तर विजय हा पराभवात परिवर्तीत होतो. आज पराभव झाला म्हणजे खचायचं कारण नाही. या पराभवातून नियोजनबद्ध रितीने पुन्हा पराभवाकडे जाता येतं”, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.