यवतमाळ जिल्ह्यातील बाभुळगाव तालुक्यातील फाळेगावमध्ये एका पित्याने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. आपल्या तीन लहानग्या मुलांना सोबत घेऊन त्यांनी विहिरीत उडी मारली. त्यामुळे पाण्यात बुडून या मुलांचाही मृत्यू झाला. कौटुबिक कलहामधून पित्याने हे कृत्य केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त करण्यात येत आहे. विहिरीतून चारही मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, ते शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत.
पांडुरंग श्रीरामजी कोडापे (वय ४०) असे पित्याचे नाव आहे. तर गायत्री (१२), जय (९) आणि कोमल (३) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलांची नावे आहेत. ही घटना समजल्यानंतर गावकऱ्यांनी तीव्र दुःख व्यक्त केले. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहेत.