पंतप्रधान मोदींची मुलाखत अक्षय कुमार घेतात आणि मुख्यमंत्र्यांची मुलाखत नाना पाटेकर घेतात, मग पत्रकार काय खुळली आहेत का? अशी खोचक टीका सुषमा अंधारे यांनी भाजपा-शिंदे गटावर केली. उस्मानाबादमध्ये आयोजित शिवसेनेच्या ‘महाप्रबोधन यात्रे’त त्या बोलता होत्या. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार टीकास्र सोडलं.

हेही वाचा – “मनुवादी अस्त्रांपासून सावध राहा” सुषमा अंधारेंचं विरोधकांवर टीकास्र!

women office bearers of Thackeray group in Kalyan join Shindes Shiv Sena
कल्याणमध्ये ठाकरे गटाला धक्का, महिला पदाधिकाऱ्यांचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश
lok sabha 2024, Vijay Wadettiwar Alleged BJP Entry, Dharmarao Baba Aatram , Chandrasekhar Bawankule , gadchiroli lok sabha seat, election 2024, Dharmarao Baba Aatram alleges Vijay Wadettiwar, congress, bjp, ajit pawar ncp, gadchiroli news, marathi news
“विजय वडेट्टीवार यांना मंत्रिपदाच्या काळातही भाजपात येण्याची घाई झाली होती…” धर्मरावबाबा आत्राम यांचा गौप्यस्फोट; म्हणाले, “त्या बैठकीत मी…”
Raj Thackeray Ankita walavalkar
“राज ठाकरेंनी महायुतीच्या सत्तेत सहभागी होण्यापेक्षा…”, कोकण हार्टेड गर्लची खास इच्छा; अमित शाहांबरोबरच्या भेटीवर म्हणाली…
raghav chadha british mp meeting
खलिस्तान समर्थकाच्या भेटीमुळे राघव चड्ढा वादाच्या भोवऱ्यात

काय म्हणाल्या सुषमा अंधारे?

“ज्या लोकांनी भ्रम तयार केला, ज्यांनी अफवा परसवल्या की उद्धव ठाकरे घराच्या बाहेर पडत नाहीत. त्यातल्या एकाही शहाण्याने, एकाही विद्वानाने भाजपा आणि मोदींजीना प्रश्नविचारला नाही की, मोदीजी तुम्ही एकही पत्रकार परिषद आजपर्यंत का घेतली नाही. एकाही पत्रकार परिषदेला मोदीजी सामोरे जात नाहीत? मुळात त्यांच्या पत्रकार परिषद नाहीत, तर मुलाखती होतात आणि मुलाखत घेतं कोण? पंतप्रधान मोदींची मुलाखत अक्षय कुमार घेतात आणि मुख्यमंत्र्यांची मुलाखत नाना पाटेकर घेतात, मग पत्रकार काय खुळली आहेत का? पत्रकारांनी मुलाखती नाही घ्यायच्या का?” अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली.

हेही वाचा – “ज्यांनी महापरिनिर्वाण दिनाला कधी बॅनर लावले नाहीत, ते…”; वंचित-ठाकरे गट बैठकीवरून दिपक केसरकरांची खोचक टीका

“ज्यावेळी तुम्ही म्हणता की उद्धव ठाकरेंनी काय केलं? त्यावेळी खुल्या पत्रकार परिषदेत उभं राहून बोलायची तुमची हिंमत आहे का? आम्ही ठामपणे उभं राहू शकतो, बोलू शकतो, सांगू शकतो की आम्ही काय काम केलं. खरं तर आम्ही काय काम केलं, हे आम्ही सांगायची गरज नाही. जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी सांगितलं आहे, की जगभरातला उत्तम पॅटर्न कुठला होता, तर तो धारावी पॅटर्न होता. जगातलं सर्वात चांगलं काम कुठं झालं असेल, तर ते मुंबई महापालिकेत झालं, पहिल्या पाच मुख्यमंत्र्यांमध्ये उद्धव ठाकरेंच नाव होतं”, असेही त्या म्हणाल्या.