जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमारमुळे राज्यातील राजकारण तापलं आहे. पोलिसांनी मराठा आंदोलकांसह काही महिलांनाही मारहाण केली आहे. या प्रकरणावरून ठाकरे गटाचे नेते शरद कोळी यांनी एकेरी उल्लेख करत भाजपा आमदार नितेश राणे यांच्यावर जोरदार टीकास्र सोडलं. पोलिसांकडून मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमारनंतर नितेश राणे तोंडात बोळा घालून बसले आहेत का? असा सवाल शरद कोळी यांनी विचारला.

“जालन्यात काल मराठा समाज बांधवांवर गृहमंत्र्यांच्या (देवेंद्र फडणवीस) आदेशाने लाठीमार करण्यात आला. तिथल्या आंदोलकांवर आणि महिला भगिनींवर बेछूट लाठीमार केला. त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. गोळीबार केला. परंतु लव्ह जिहाद केलेला भाजपाचा नितेश राणे आता कोणत्या बिळात जाऊन बसला आहे? त्याचं तोंड आता शिवलं आहे का? तोंडात बोळा घालून बसला का?” अशा शब्दांत शरद कोळी यांनी टीकास्र सोडलं.

Suresh Dhas On Santosh Deshmukh Case
Suresh Dhas : “राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य मुन्नीला बोलायला लावा?”, सुरेश धस यांचं विधान, रोख कुणाकडे? परळी पॅटर्नचा उल्लेख करत म्हणाले…
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Uddhav Thackeray and rahul gandhi
इंडिया आघाडीत बिघाडी? विसंवादावरून ठाकरे गटाची काँग्रेसवर तोफ; म्हणाले, “हेवेदावे, जळमटे अन् कुरघोड्यांना…”
Image Of MVA Leaders
MVA : “महाविकास आघाडी उद्ध्वस्त होतेय, जनतेने त्यांना हाकलून दिले”, ठाकरे गटाचा स्वबळाचा नारा; अजित पवार गटाचा टोला
Supriya Sule
Supriya Sule : महापालिका निवडणुकीबाबतच्या ठाकरे गटाच्या भूमिकेवर सुप्रिया सुळेंचं रोखठोक मत; म्हणाल्या, “या निवडणुका…”
Vijay Wadettiwar On Thackeray group
Vijay Wadettiwar : “आम्ही उद्धव ठाकरेंना विनंती करू, अन्यथा…”, ठाकरे गटाच्या स्वबळाच्या घोषणेवर विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान
Uddhav thackeray and Prakash Ambedkar
ठाकरेंच्या शिवसेनेने स्वबळाचा नारा दिल्यानंतर प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप; म्हणाले, “आदित्य ठाकरेंच्या…”
Amit Deshmukh On BMC Election 2025
Amit Deshmukh : ठाकरे गटाच्या स्वबळाच्या घोषणेनंतर काँग्रेसची भूमिका काय? अमित देशमुखांचं मोठं भाष्य; म्हणाले, “आम्ही देखील…”

हेही वाचा- “…तर महाराष्ट्रातला मनसेचा पहिला खासदार १०० टक्के मीच असेल”, वसंत मोरेंचं मोठं विधान

शरद कोळी पुढे म्हणाले, “गृहमंत्र्यांचं म्हणणं आहे की, मराठा समाज बांधवांनी पोलिसांवर दगडफेक केली. पण हे पूर्णपणे खोटं आहे. कारण आजपर्यंत मराठा समाजाने लाखोंच्या संख्येनं आंदोलन केलं. पण एक घोषणाही चुकीच्या पद्धतीने दिली नाही. मग ही दगडफेक तर खूप लांबची गोष्ट आहे.”

हेही वाचा- “अजित पवारांचे सर्व अधिकार काढून…”, फडणवीसांच्या नियंत्रणाबाबत एकनाथ खडसेंचं मोठं विधान

पण भाजपाच्या काही नेत्यांनी मराठा समाजावर हल्ला करून यापुढे आरक्षण मागायचं नाही, आंदोलन करायचं नाही, असा एकप्रकारे इशारा दिला आहे की काय? असा प्रश्न पडतो. तुम्ही आंदोलन केलं तर तुम्हाला पोलीस यंत्रणेद्वारे असंच बेदम मारलं जाईल, असा इशाराच सरकारने दिला आहे. पण मी सांगू इच्छितो मराठा बांधवांसह राज्यातील इतर आठरा पगड जातीचे लोक २०२४ ला भाजपाला त्यांची औकात आणि त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असंही ठाकरे गटाचे नेते शरद कोळी म्हणाले. त्यांनी एक व्हिडीओ जारी करत ही टीका केली.

Story img Loader