मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठण प्रकरणात खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा या दाम्पत्याविरोधात सत्र न्यायालायत सुनावणी सुरू आहे. मागच्या सुनावणीवेळी राणा दाम्पत्य गैरहजर होते. तर, आजही सुनावणीला पोहोचण्यास राणांना उशीर झाल्याने सत्र न्यायालायने त्यांना झापलं आहे. दरम्यान, ही सर्व उद्धव ठाकरेंची देण आहे, अशा कठोर शब्दांत नवनीत राणा यांनी ठाकरेंवर टीका केली आहे. कोर्टातील सुनावणी संपवून बाहेर आल्यानंतर नवनीत राणा यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.
“प्रत्येकवेळी कोर्टात यावं लागतं, हजेरी द्यायला लागते, ऐकावं लागतं. ही उद्धवसाहेबांची ही देण आहे. हनुमान चालिसा वाचेन म्हटलं होतं तर या सर्व गोष्टी सुरू आहेत आजही. कधी डोंबिवली, बोरिवलीला बोलवतात. अनेक केसेस सुरू आहेत. तर कधी वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात जावं लागतं. एक महिला म्हणून खूप वाईट वाटतंय. आज रवी राणांना बरं नाही म्हणून मला यावं लागलं. पण मनाला खूप वाईट वाटण्यासारखं आहे. परंतु, कोर्टाचे आदेश मान्य असतात”, असं नवनीत राणा
मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठण प्रकरणात खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना अटक झाली होती. त्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार होतं, त्यामुळे राणा दाम्पत्याने उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. दरम्यान, याप्रकरणी मुंबई
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.