लोकसत्ता प्रतिनिधी

सांगली : जो जो तिरंग्याला सलाम करेल, राष्ट्रगीत म्हणेल, त्या हिंदूंचे रक्षण करण्याचे आमचे काम आहे. हे हिंदूंचे राष्ट्र आहे, त्यामुळे या ठिकाणी सर्वांत प्रथम हिंदूंचे हितच पाहिले जाईल, असे प्रतिपादन मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नीतेश राणे यांनी शुक्रवारी सांगलीत केले. विशाळगडावर उरूस भरवण्यासही त्यांनी विरोध केला असून, असा प्रकार झाल्यास तो हाणून पाडला जाईल, असेही राणे म्हणाले.

Rahul Gandhi Accuses BJP and RSS of Capturing India
आपली लढाई भारतीय राज्य यंत्रणांशीही! राहुल गांधी यांच्या विधानाने वादंग; भाजप, संघाने प्रत्येक संस्था ताब्यात घेतल्याचा आरोप
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Prime Minister Modi guided mahayuti MLAs on re election strategies and constituency work
पंतप्रधानांचा ‘गोपनीय’ गुरुमंत्र आमदारांकडून, ‘जाहीर’सत्तेचा गर्व न ठेवता आचरण करण्याचा मोदींचा सल्ला
Anna Bansode statement over Sharad Pawar praise RSS
Sharad Pawar: मविआचं पुढं काय होणार? राष्ट्रवादीचे खासदार महायुतीत जाणार? शरद पवारांनी केलं स्पष्ट; म्हणाले…
Sanjay Raut Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : वाल्मिक कराड आणि फडणवीसांचं नेमकं नातं काय? संजय राऊतांचे मुख्यमंत्र्याना गंभीर सवाल
देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू ते भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष; कोण आहेत रवींद्र चव्हाण? (फोटो सौजन्य @Dev_Fadnavis)
Maharashtra Politics : देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू ते भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष; कोण आहेत रवींद्र चव्हाण?
Sharad Pawar on RSS Cadre
Sharad Pawar on RSS: शरद पवारांकडून RSS ची स्तुती; संघासारखे केडर निर्माण करण्याची गरज का व्यक्त केली?
Ramsar sites Maharashtra
राज्यातील रामसर स्थळांचे संरक्षण न्यायालयाच्या देखरेखीखाली, न्यायालयाकडून जनहित याचिका दाखल

सांगलीत आयोजित करण्यात आलेल्या हिंदू गर्जना सभेत राणे बोलत होते. या वेळी आ. सुरेश खाडे, सत्यजित देशमुख, भाजपच्या नेत्या नीता केळकर, शेखर इनामदार, माजी आमदार नितीन शिंदे आदी उपस्थित होते.

आणखी वाचा-उदयनराजेंसह वारसांना जमीन महसूल सूट कायम, राज्य शासनाचा निर्णय

राणे म्हणाले, की हे हिंदूंचे राष्ट्र असून, या ठिकाणी हिंदू हितच सर्वप्रथम पाहिले जाईल. ‘भाईचारा’सारखी वक्तव्ये पाकिस्तानात जाऊन करावीत. आजही अनेक ठिकाणी पूजा, आरती करण्यासाठी आपल्याला दोन वेळा विचार करावा लागत असेल, तर आपण हिंदू राष्ट्रात राहतो का, असा प्रश्न पडतो. ‘सेक्युलर’ शब्दाची काँग्रेसने घाण केली आहे. हिंदू म्हणून आपली भूमिका आणि विचार स्पष्ट असलेच पाहिजेत. मी हिंदूंच्या मतावरच आमदार झालेलो आहे. मी मत मागण्यासाठी मुस्लीम मोहल्ल्यात गेलोच नाही.

विरोधक ‘ईव्हीएम’ला दोष देतात. पण आम्ही तिकडे ‘ईव्हीएम’वरच निवडून आलो. हे आमचे ‘ईव्हीएम’ म्हणजे ‘एव्हरी व्होट्स अगेन्स्ट मोहल्ला.’ ज्याने भगवाधारी सरकार आणले, त्याचे संरक्षण करणे ही आमची जबाबदारी आहे. राज्यात आता हिंदुत्ववादी सरकार आहे. विशाळगडावर १२ तारखेला कसा उरूस होतो हे आम्हाला पाहायचे आहे, असा इशाराही त्यांनी या वेळी दिला.

आणखी वाचा-Devendra Fadnavis : राष्ट्रीय अध्यक्ष व्हायला सांगितलं तर व्हाल का? मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान; म्हणाले, “पक्ष जे सांगेल…”

या वेळी आ. सुरेश खाडे म्हणाले, की ‘बटेंगे तो कटेंगे’ या नाऱ्यामुळे विधानसभा निवडणुकीवेळी सर्व हिंदू एकत्र आला. आम्ही दलित असलो, तरी हिंदू आहोत. हे हिंदू राष्ट्र होण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. मी मिनी पाकिस्तानमधून लढून चार वेळा निवडून येत चौकार मारला आहे.

Story img Loader