लोकसत्ता वार्ताहर

सावंतवाडी : गोवा – दोडामार्ग – बेळगाव – कोल्हापूरला जवळचा मार्ग असलेल्या तिलारी घाटातील धोकादायक जयकर पॉईंट उतारावर एका ठिकाणी संरक्षण कठडा रस्ता खचला आहे. हे कारण पुढे करून चाळीस वर्षे सुरू असलेली एस टी बस सेवा सात महिने बंद आहे. प्रवाशांची गैरसोय झाली आहे. पण अशा परिस्थितीत खाजगी वाहने सुरू आहेत. एस टी बस सेवा सुरू झाली पाहिजे यासाठी संरक्षण कठडा दुरुस्ती कामाला सुरुवात करा अन्यथा आंदोलन करू असा इशारा दिला होता.

thane news
कल्याणमधील वडवली-अटाळी वळण रस्ते मार्गातील ११८ बांधकामे जमीनदोस्त; टिटवाळा-कल्याणचा प्रवास सुखकर होणार
Manoj Jarange, Manoj Jarange movement,
विश्लेषण : मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा प्रभाव ओसरला?…
thane underground aqueducts are leaking near thakurli flyover on busiest savarkar road and nehru road in dombivli
डोंबिवलीत सावरकर रस्ता, नेहरू रस्त्यावर गळक्या जलवाहिनींचे ओहोळ
Discussion between MLA Atul Bhosale and experts for Preeti Sangam beautification Necklace Road karad news
प्रीतिसंगम सुशोभीकरण, नेकलेस रोडसाठी पाहणी; आमदार डॉ. अतुल भोसले, तज्ज्ञांमध्ये चर्चा
Traffic congestion in Rajput Colony will be resolved to some extent Pune
रजपूत वसाहतीमधील कोंडी सुटणार ?
Ahilyanagar district accident spots roads highways
अहिल्यानगर जिल्ह्यातील महामार्गांवर ४३ अपघातजन्य ठिकाणे
Maharashtra government plan new city development close Vadavan port
‘वाढवण’लगत आणखी एक मुंबई; १०७ गावांतील ५१२ चौ. किमी विकास केंद्राचा प्रस्ताव
Leopard Safari at Sanjay Gandhi Park Announcement by Guardian Minister Ashish Shelar Mumbai news
संजय गांधी उद्यानात ‘बिबट्या सफारी’; पालकमंत्री आशिष शेलार यांची घोषणा

या नंतर बांधकाम विभाग चंदगड कोल्हापूर यांनी टेंडर काढले. हे दुरुस्तीचे काम सुरू केले जाणार आहे. यासाठी तिलारी घाट सर्व वाहतूकीसाठी बंद ठेवला आहे. असे पञ बांधकाम विभाग चंदगड यांनी जाहीर केले आहे. दोडामार्ग चंदगड पोलिस याना कळवले आहे. त्यामुळे वाहन धारकांनी तिलारी घाट मार्गे प्रवास करू नये असे आवाहन केले आहे.

पावसाळ्यात तिलारी घाटात दरडी कोसळणे, रस्ता खचणे या गोष्टी विचारात घेऊन कोल्हापूर जिल्हाधिकारी यांनी २१ जून ते ३१ ऑक्टोबर पर्यंत सर्व अवजड वाहने यांना बंदी घातली होती. पण अवजड वाहने सुरू होती. पावसाळ्यात तिलारी घाटात जयकर पॉईंट उतारावर रस्ता संरक्षण कठडा तुटला होता. जुलै मध्ये ही घटना घडली होती. या ठिकाणी बॅरल ठेवले होते.

तिलारी घाटातील अवजड वाहने बंदी उठवली पण एस टी बस सेवा सुरू झाली नव्हती तेव्हा रस्ता रोको आंदोलन उपोषण सरपंच सेवा संघटना अध्यक्ष प्रविण गवस, कोदाळी सरपंच, इतर सामना कार्यकर्ते यांनी केले होते. या नंतर कोल्हापूर विभाग नियंत्रण यांनी घाटाची दोन वेळा पाहणी केली. पण संरक्षण कठडा दुरुस्ती झाल्याशिवाय एस टी बस सेवा सुरू केली जाणार नाही असे सांगितले.

Story img Loader