बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोप बांगलादेशी असल्याचा आरोप झाल्यानंतर आता महाराष्ट्रात किती बांगलादेशी घुसखोर आहेत, याची चर्चा सुरू झाली. भाजपा नेते किरीट सोमय्या हे या प्रकरणी पाठपुरावा करत असून ते विविध जिल्ह्यांचा दौरा करत आहेत. राज्यात दोन लाख बांगलादेशी रोहिंग्या मुस्लीमांना बनावट जन्म प्रमाणपत्र देण्यात आले आहेत. मालेगावपासून याची सुरुवात झाली असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला. मालेगावमधील दोन राजकीय नेते, दहशतवादी संघटनेचे नेते आणि सीमेवरील दोन एजंट यात सामील आहेत. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने एटीएसची स्थापना केली आहे. जे बांगलादेशी रोहिंग्या खरी प्रमाणपत्रे सादर करू शकणार नाहीत, त्यांना पुन्हा बांगलादेशमध्ये पाठविले जाणार आहे.

बांगलादेशी रोहिंग्यांना बनावट जन्म प्रमाणपत्र दिल्याबद्दल नुकतेच मालेगावचे तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांना निलंबित करण्यात आले आहे. मालेगावप्रमाणेच इतर ठिकाणीही आता कारवाई होणार असून काही अधिकाऱ्यांचे निलंबन होणार असल्याचे सुतोवाच सोमय्या यांनी केले आहे. एका बाजूला अधिकाऱ्यांवर कारवाई दुसऱ्या बाजूला या बांगलादेशींना परत पाठवण्याचे काम केले जाणार आहे. तसेच यापुढे जन्म प्रमाणपत्र देत असताना व्यवस्थित लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचेही ते म्हणाले.

Maharashtra Kesari 2025 result Shivraj Rakshe prithviraj mohol Controversy
Maharashtra Kesari : एवढं ‘मोहोळ’ का उठलंय? राष्ट्रवादीच्या नेत्याचा कुस्तीत राजकारण शिरल्याचा आरोप; म्हणाले, “खरा जिंकला तो…”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Maharahstra Kesari
Maharahstra Kesari : महाराष्ट्र केसरी स्पर्धेत मोठा गोंधळ, पैलवान शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारल्याचा आरोप, नेमकं काय घडलं?
Ramdas Kadam On NCP Ajit Pawar Group
Ramdas Kadam : राष्ट्रवादी-शिंदे गटात वादाची ठिणगी? रामदास कदमांचा मोठा आरोप; म्हणाले, “राष्ट्रवादीच्या ९० टक्के कार्यकर्त्यांनी…”
Tahawwur Hussain Rana extradited to India
२६/११ हल्ल्यापूर्वी १५ दिवस तहव्वूर राणा मुंबईत; हेडलीच्या दोन ईमेलने कटातील सहभागाचा उलगडा
Two Bangladeshis arrested from pimpri
पिंपरी : दोन बांगलादेशींना अटक; आत्तापर्यंत किती घुसखोर बांगलादेशींवर कारवाई?
Mira Road, Bangladesh nationals arrested ,
सैफ प्रकरणानंतर बांगलादेशींची धरपकड सुरू, मिरा रोडमधून ३ बांगलादेशी नागरिकांना अटक
Saif ali khan attack case, Accused Shariful ,
सैफवर हल्ला प्रकरण : आरोपी शरिफुलचा बांगलादेशातील चालक परवाना पोलिसांच्या हाती

किरीट सोमय्या यांनी जिल्ह्यानुसार जन्म प्रमाणपत्र वाटल्याची आकडेवारी दिली. ते म्हणाले, यवतमाळला १३,५००, अमरावती आणि अकोलामध्ये १५,००० लोकांना प्रमाणपत्र दिले गेले आहे. तर अकोला शहरात साडेचार हजार लोकांना प्रमाणपत्र मिळाले आहे. अमरावतीमधील गाव अंजनगाव सुर्जीमध्ये २२ हजार मुस्लिमांची संख्या असून त्यात १,४८० बांगलादेशी मुस्लीम आहेत.

महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार असताना बांगलादेशाच्या सीमेवरील एजंट यांनी मोठे षडयंत्र आखले. लोकसभेत यांचे अधिक खासदार निवडून आल्यानंतर आता त्यांचे सरकार येणार या विचाराने त्या चार-पाच महिन्याच्या काळात महाराष्ट्रात दोन लाख बांगलादेशी रोहिंग्यानी अर्ज केला होता. यापैकी १ लाख ७ हजारांना जन्म प्रमाणपत्र देण्यात आले, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला.

Story img Loader