राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, भाजपा नेते सुधांशू त्रिवेदी, मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा अशा नेतेमंडळींनी सातत्याने शिवाजी महाराजांविषयी केलेल्या विधानांवरून राजकारण तापलं आहे. या विधानांवरून मोठा वाद निर्माण झाला असून सर्वच स्तरांतून त्याचा निषेध केला जात आहे. या पार्श्वभूमवीर छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांनी आज रायगडावर ‘निर्धार शिवसन्मानाचा’ या नावाने कार्यक्रम घेऊन राज्यपाल आणि भाजपावर परखड शब्दांत टीकास्र सोडलं. तसेच, शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त विधानं करणाऱ्यांना गंभीर इशाराही त्यांनी यावेळी दिला.

पुढचा मोर्चा आझाद मैदानावर!

आपली भूमिका मांडण्यासाठी मुंबईत आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा इशारा उदयनराजे भोसले यांनी दिला आहे. तसेच, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानासाठी महाराष्ट्र दौरा काढण्याचा मानस असल्याचंही उदयनराजे भोसले यांनी बोलून दाखवलं. यावेळी बोलताना त्यांनी राज्यपालांवर हकालपट्टीच्या मागणीसोबतच भविष्यात कुणीही शिवछत्रपतींचा अपमान करू नये, असा सज्जड दम भरला आहे.

Navneet Rana Answer to Sanjay Raut
‘नाची’, ‘डान्सर’, बबली म्हणणाऱ्या संजय राऊतांना नवनीत राणांचं जशास तसं उत्तर, म्हणाल्या, “मला बोलण्याआधी..”
west bengal governor cv ananda bose
अन्वयार्थ : राज्यपालांना ‘अपवादात्मक’ सल्ला
Satej Patil criticize Sanjay Mandlik says MPs do not meet even for a simple letter
साध्या पत्रासाठीही खासदार भेटत नाहीत; सतेज पाटील यांची संजय मंडलिक यांच्यावर टीका
After the EPS-95 pensioners the Halba community also upset with BJP
इपीएस-९५ पेन्शनधारकानंतर ‘हलबा’ बांधवही सत्ताधाऱ्यांवर नाराज; म्हणाले, “भाजपला…”

“शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे”, म्हणत रायगडावरून उदयनराजे भोसलेंची मोठी घोषणा; म्हणाले, “आझाद मैदानात…!”

“आपण काय मिळवलं?”

“ज्यांनी आपलं आयुष्य आपल्यासाठी ज्या युगपुरुषानं वेचलं, आज त्यांचाच अवमान या देशात होतोय. महाराष्ट्रात होतोय. आपण सर्वजण गप्प बसणार आहोत का? त्यांच्या विचारांचा विसर पडल्यामुळे काय घडलं? मागे वळून पाहा. सर्वधर्मसमभाव याचा विसर पडला, त्या त्या वेळच्या राज्यकर्त्यांना विसर पडला, तेव्हा या देशाचं विभाजन झालं. फाळणी झाली. या देशाचे तीन तुकडे झाले. या फाळणीमध्ये अनेक लोकांना वेदना सहन कराव्या लागल्या. जवळचे नातेवाईक मृत्यूमुखी पडले. आपण काय मिळवलं?” असा सवाल उदयनराजे भोसलेंनी केला आहे.

“…तर राज्यपालांचा टकमक टोकावरून कडेलोट…”, उदयनराजे भोसलेंनी मांडली आक्रमक भूमिका; रायगडावरून भाजपावरही टीकास्र!

“अनेक महापुरुषांची खिल्ली उडवली गेली. अवमान केला गेला आणि आपण पाहात बसलो. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान म्हणजे आपल्या सगळ्यांचा अपमान आहे असं आपल्याला वाटत नाही का? आपण काही करणार आहोत की नाही? या राजकारणाच्या तावडीत तुम्ही किती दिवस राहणार आहात?” असंही ते म्हणाले.

“यात कोणतंही राजकारण येऊ देऊ नका”

“लवकरच एक तारीख ठरवून मुंबईतल्या आझाद मैदानात जायचंय. आजचा दिवस इतिहासात लिहून ठेवण्यासारखा दिवस आहे. कारण आज आपण आपल्या सगळ्यांची अस्मिता असणाऱ्या शिवाजी महाराजांचा सन्मान राखण्यासाठी एक निर्धार केला आहे. आज आपण सगळे इतिहासाचा भाग झालो आहोत. कुठल्याही प्रकारे यात राजकारण येऊ देऊ नका. यामागे कुणाचाच स्वार्थ नाही. शिवाजी महाराजांचा अवमान यापुढे कुणी करूनच दाखवावा. काय होईल, ते आपल्या परीने आपण बघूनच घेऊ”, अशा शब्दांत उदयनराजे भोसलेंनी इशारा दिला आहे.