मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखील ४० आमदारांनी बंड केल्यानंतर शिवसेना पक्षात उभी फूट पडली. या बंडखोरीमुळे ५ सप्टेंबर रोजी शिवसेना पक्षाचे दोन वेगवेगळे दसरा मेळावे आयोजित करण्यात आले. दादरमधील शिवाजी पार्कवर झालेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे समर्थकांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघाती टीका केली. या टीकेलाही नंतर एकनाथ शिंदे गटाने जशास तसे उत्तर दिले. दरम्यान, शिवसेनेच्या या दसरा मेळाव्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आता मोठी घोषणा केली आहे. मी महाराष्ट्राचा विभागनिहाय दौरा करणार आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. ते मुंबईत शिवसैनिकांना संबोधित करत होते.

हेही वाचा >>> शिवसेना, काँग्रेससोबतच्या युतीवर प्रकाश आंबेडकरांचे मोठे विधान, म्हणाले, “युती करायची असेल तर…”

chavadi political situation in maharashtra ahead of lok sabha election diwali organized by political leaders
‘सत्ता खूप वाईट, नंतर कुणी चहा सुद्धा पाजत नाही’, सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केली खंत
Tanaji Sawant News
तानाजी सावंतांचा अजित पवारांसमोरच मोठा इशारा; म्हणाले, “…तर आम्ही सहन करणार नाही”
Shiv Sena shinde group leaders Upset Over Archana Patil s Nomination in Dharashiv Lok Sabha Constituency
अर्चना पाटील यांच्या उमेदवारीनंतर शिंदे सेनेमध्ये रोष, आरोग्यमंत्री सावंत यांचे समर्थक विरोधात
hema malini and yogi
‘काँग्रेसचे मानसिक संतुलन ढळले’; हेमा मालिनी यांच्याबाबत कथित आक्षेपार्ह विधानांनंतर भाजपची टीका

याआधीही मी याबद्दल सांगितलेले आहे. पुढेही सांगत राहीन. लवकरच मी महाराष्ट्राचा विभागनिहाय दौरा करणार आहे. मी तुमचे याआधीही आभार मानलेले आहेत. आताही तुमच्या प्रेमबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

हेही वाचा >>> “…मग तू काय काम करणार,” उद्धव ठाकरेंवर नारायण राणेंची खोचक टीका; आजारपणाचाही केला उल्लेख, म्हणाले…

शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यातील संघर्ष सध्या सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगापर्यंत पोहोचलेला आहे. शिवसेना पक्ष कोणाचा तसेच धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह कोणाचे याबाबतची सुनावणी निवडणूक आयोगात सुरू आहे. निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या पाठिंब्याच्या जोरावर शिंदे गटाकडून धनुष्यबाण या चिन्हावर अधिकार सांगितला जात आहे. तर नोंदणीकृत पक्षातील नियमावलीचा आधार घेत धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह आमच्याडेच राहील असा दावा उद्धव ठाकरे समर्थकांकडून केला जात आहे. दोन्ही गटांकडून दावे-प्रतिदावे केले जात असताना निवडणूक आयोग काय निकाल देणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.