वाई: राज्यसभा निवडणुकीत विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे अपक्षांना त्यांना बाजूने वळवण्यात यशस्वी ठरले आणि त्यांनी धनंजय महाडिकांना निवडून आणले. तर शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार यांचा दारुण पराभव झाला. त्यामुळे उद्धव ठाकरे नाराज होणे सहाजिक आहे, असे मत जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले.

माण-खटाव साठी टेंभू योजनेतून अडीच टीएमसी पाणी आरक्षित केल्याबद्दल कृतज्ञता वचनपूर्ती कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते.

सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार मकरंद पाटील, आमदार शशिकांत शिंदे, प्रभाकर देशमुख, आमदार दीपक चव्हाण, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, सातारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील उपस्थित  होते. यावेळी जयंत पाटील बोलत होते.