मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात सोमवारी ( १४ नोव्हेंबर ) रात्री उशिरा बैठक पार पडली. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानावर ही बैठक झाली. या बैठकीत दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारावार चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. तसेच, जितेंद्र आव्हाड यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यावरही चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे. या दोन्ही प्रकरणावरून काँग्रेसचे नेते, माजी मंत्री विजय वडेट्टीवर यांनी सरकारचा समाचार घेतला आहे.

जितेंद्र आव्हाड यांच्यावरील केलेली कारवाई ही सूडबुद्धीने केली का? असे विचारले असता वडेट्टीवर म्हणाले, “जे काही चाललं आहे, ते योग्य नाही. राजकीय पक्षाच्या नेत्याला कट रचून अडकवणे, गुन्हे दाखल करुन त्याची प्रतिमा मलिन करणे ही भारताची प्रगती आहे की, अधोगती. विरोधकांना संपवून टाकायचे ही भूमिका संविधानाला न माननारेच स्विकारू शकतात.”

article about conspiracy to defame the judiciary constitution protection by judiciary
लेख : न्यायपालिकेच्या बदनामीचे षड्यंत्र!
abdul karim tunda acquitted in 1993 serial blasts case
१९९३ च्या साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी अब्दुल करीम टुंडा निर्दोष मुक्त
Bhandara District Jail, Female Guard, Assaulted, Detainee, crime news,
धक्कादायक! कारागृहातील बंदीवानाचा महिला रक्षकावर प्राणघातक हल्ला
firearms seized in thane marathi news, illegal firearms marathi news
निवडणुकांपूर्वी मध्य प्रदेशात तयार होणारे अवैध अग्निशस्त्र ठाण्यात ?

हेही वाचा : ठरलं! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘या’ तारखेला आमदारांसह पुन्हा गुवाहाटीला जाणार

मंत्रिमंडळ विस्तारासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची बैठक पार पडली. यावर विचारले असता, “किती लोकांनी बाशिंग बांधून ठेवलं आहे आणि त्यातील कितीजण नवरदेव होतात कळेलं. ज्यांना नवरदेव करणार नाहीत, ते दुसरी नवरी शोधण्यासाठी कुठे जातात पाहू,” असा टोला विजय वडेट्टीवर यांनी लगावला आहे.