काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना असे तीन राजकीय पक्ष सत्तास्थापनेसाठी एकत्र येतील, असं कुणाच्या स्वप्नात देखील आलं नव्हतं. पण संजय राऊत यांच्यामुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं असं विधान सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलं की, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या अंगात आलं आणि महाविकास आघाडी स्थापन झाली. त्यांच्यामुळे आम्ही राज्यात सत्तेवर आलो, असे सत्तास्थापनेचं गुपित कदम यांनी सांगितलं आहे. पलूस तालुक्यातील आमणापूर येथे विविध विकास कामाचे उद्घाटन कदम यांच्या हस्ते झालं. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vishwajeet kadam on sanjay raut and mahavikas aghadi formation rmm
First published on: 15-06-2022 at 19:54 IST